ध्यान म्हणजे काय?

Sep 21, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

 

 

ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ आहे..आणि मग ध्यान ध्यान न राहता एक तांत्रिक पद्धत बनते..खरंतर ध्यान म्हणजे सृष्टीची अशी व्यवस्था ज्यात आपण..आपल्या स्व अवस्थेवर जाण्यासाठी केलेला प्रयत्न..म्हणजेच काय ज्या अवस्थेत आपण आपल्या स्वतःशी संवाद साधू शकतो अशी पद्धती म्हणजे ध्यान..असो..जशी व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच प्रत्येकाची ध्यान करण्याची वेगळी वेगळी पद्धती असणार..आणि ती चुकीची असू शकत नाही..म्हणून सर्वप्रथम आपणस अमुक एक पद्धतीच योग्य असा जर आपल्या मनात असेल तर आपणस सर्वप्रथम काढून टाकायचा आहे..कारण ध्यानाची सुरवातच विना अट होते..
ध्यानात सुरवातच मुळात मनावर होते..आपण ध्यान करण्यास सुरुवात करतो..आपले मन पहिल्या दिवशी विरोध करत नाही..पण एक दोन दिवसात आपणस नको नको वाटते..आपले मन आज नको उद्या करू असा प्रतिसाद देते..म्हणुन सर्वप्रथम आपणस मन नाही म्हंटले तरी ध्यान करण्यासाठी बसायचे आहे..ध्यान करण्यास बसले की मनात विचारांचा काहूर सुरू होईल..जसे विचार येतील तसे जातील ही..पण आपले काय होते..मी आज ध्यान केले म्हणजे लगेचच माझे मन निर्विचार झाले पाहिजे..खरंतर असे एका दिवसात होऊ शकत नाही..या साठी अनेक वर्षे आपणस दयावे लागतील..काही जण ध्यान या मुळे करत नाहीत कारण मनातील विचार थांबत नाहीत..खरंतर आपण कधीच निर्विचार होणार नाही मग आपण कधीच ध्यान करणार नाही का..सर्वप्रथम हा विचार मनातून काढून टाका की..ध्यान करताना विचारच मनात आले नाही पाहिजे..जसे विचार येतील तसे ते निघूनही जातात..फक्त गरज आहे आपण बसण्याची..आता मनात प्रश्न येतो की ध्यान किती वेळ करावे.. दिवसातील किमान २० मिनिटे आपण ध्यान करावे…सुरवातीला ही वेळ खूप मोठी वाटेल..पण सराव केल्यानंतर ही वेळ फार कमी वाटेल..म्हणून आज पासून किमान २० मिनिटे स्वतः साठी देऊया…ध्यान करताना अनेकांच्या मनात प्रश्न असतो की कुठे बसून ध्यान करावे.. कसे बसावे..खरंतर ज्या ठिकाणी २० मिनिट आपण बसू शकतो..ज्या आसनात आपणस त्रास होत नाही..अश्या ठिकाणी..आसनात बसून ध्यान करावे…मग खुर्चीवर बसूनही आपण ध्यान करू शकतो…
आता ध्यान कोणते करावा हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो..खरंतर वर सांगितल्याप्रमाणे आपणस जे योग्य वाटेल..त्या पासून सुरवात करा..सुरवात महत्वाची..इथे पद्धती सांगत आहोंत..
१)श्वासावर ध्यान- यात आपण केवळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो..म्हणजे आपणस डोळे मिटून बसायचे.. मोबाईल।मध्ये २० मिनिटांचा टाईमर लावा.. हळूहळू डोळे बंद करा..आपले लक्ष श्वासावर केंद्रित करा..आपणस लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे..अनेकदा आपले लक्ष विचलित होते..परत आपणस त्याला श्वासावर केंद्रित करायचे आहे..ही पद्धत आपण वापरू शकता..!
2) दुसरी पद्धत प्रत्येकाची कोणत्या तरी देवावर श्रद्धा..विश्वास असतो..आपण त्या देवतेचा मंत्राचा जप करत असतो..जसे श्री स्वामी समर्थ..इथे आपणस आपल्या इष्ट देवतेचा मंत्र जप श्वासावर करायचा आहे..इथे जप।मोजायचा नाही..फक्त प्रत्येक श्वासावर जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे..प्रत्येक नामावर आपणस अधिकाधिक नामावर ध्यान करायचे आहे…ही खूपच छान अशी ध्यानाची पद्धती आहे..!
आपण आपणस जी योग्य वाटेल.. ती पद्धत आपण निवडू शकता..गरज आहे फक्त ध्याना साठी बसण्याची.. बाकी सर्व समर्थ करून घेतात..!
चला आपण समर्थांना ध्यानासाठी प्रार्थना करूया…!
हे समर्था..आज ध्यानवर चिंतन.. मनन करून घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..ह्रदयात तुझा वास आहेस..परंतु दिसत नाहीस..त्या दर्शनासाठीचं तर ध्यानाची सुविधा तू निर्माण करून दिली आहेस..माझ्या मनाला ध्यानासाठी तयार कर..आम्हाला ध्यानावर स्थिर कर…आमचा प्रत्येक श्वास स्वामीमय बनव..ही समज दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..!


Share
और पढिये !!

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...