श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

Sep 12, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा… ! 

आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे पूजा केली.. नैवद्य अर्पण केला.. इतके भक्तिमय वातावरण होते कि सर्व सेवेकरी सेवेत तल्लीन झाले होते.. श्री बंकटलाल तर भक्तीत इतके तल्लीन झाले होते.. त्यांचे घर द्वारकापुरी सारखे झाले होते… तो दिवस सोमवारचा होता.. त्यावेळेस तिथे श्री बंकटलाल यांचे चुलत भाऊ इच्छाराम सुद्धा तिथेच होते… ते शिव भक्त होते.. त्या दिवशी त्यांचा उपवास होता.. त्यांनी श्री महाराजांना प्रार्थना केली.. महाराज आपण करुणाघन आहात.. आपण सर्वांच्या इच्छेची पूर्ती करता.. माझी आपणस विनंती आहे कि.. आपण संध्याकाळचे भोजन देखील आमच्याकडे करावे.. आपण जर जेवण केले नाही तर मी देखील भोजन करणार नाही.. आपण सर्वांची इच्छा पूर्ण करता.. माझी इतकी इच्छा पूर्ण करा.. महाराज भोजन करण्यास तयार झाले.. इच्छाराम भोजनाचे ताट घेऊन आले.. ताटात आंबेमोहर तांदळाचा भात , मोतीचूर चे लाडू , जिलेबी, अजूनही बरेच पदार्थ होते.. श्री महाराज स्वतःशीच बोलले.. “आता इतके खा कि कधीच खाण्यास मिळाले नाही.. सगळ्यांना दाखव अति खाणे काय असते.. असे म्हणून महाराज भोजन करण्यास सुरवात करतात.. त्यांनी ताटातील सर्व अन्न ग्रहण केले.. त्यांनी इतके जेवण केले कि त्यांना तिथेच जोराची उलटी झाली.. हि त्यांची लीला होती.. बोला श्री गजानन महाराज कि जय !

बोध – वरील लीलेत खूपच खोल असा संदेश दडला आहे.. वरील लीलेत इच्छा रामजी यांनी आपली इच्छा महाराजांना सांगितली व इच्छा युक्त भक्ती साठी श्री महाराजांना भोजनाचा आग्रह केला.. त्यांना माहित होते श्री महाराजांचे भोजन झाले आहे तरी आपल्या व्रताच्या पूर्ती साठी महाराजांना भोजनाचा आग्रह धरला.. श्री महारांजानी सुद्धा आपणस बोध प्राप्त व्हावा यासाठी भोजन करण्यास तयार झाले.. त्यांनी केवळ भोजनच केले नाही तर आणलेले सर्व भोजन त्यांनी ग्रहण केले आणि लगेचच उलटी केली.. इथे ते सर्व अन्न पचवू शकत होते पण जाणून बुजून त्यांनी उलटी केली कारण त्यांना सर्वांना दाखवून द्याचे होते कि कुणालाही कोणत्याच गोष्टीचा आग्रह करू नका.. ज्याला जितकी भूख आहे तो तितके अन्न ग्रहण करेल.. त्याला आग्रह करून खाऊ घालूं नका.. इथे इच्छा रामजी सारखे आपले सुद्धा होते.. कुठेही कोणती चांगली खाण्याची वस्तू दिसली कि ती खाण्याचा मोह आपण रोखू शकत नाही मग तेव्हा आपणस भूख असो व नसो आपण अतिरिक्त अन्न ग्रहण करतो.. अश्या प्रकारे आपण आपली शरीरावर अन्याय करतो… असे आपण करू नये हा बोध देण्यासाठी श्री गजानन महाराजांनी हि लीला केली असावी असा बोध मिळतो.. बोला गजानन महाराज कि जय .. !

प्रार्थना – श्री गजानन महाराज आपण तर करुणाघन आहात.. आजच्या लीलेच्या माध्यमातून आपण आम्हाला समज दिलीत कि शरीराला आवश्यक असेल तितकेच अन्न आपण ग्रहण करणे आवश्यक आहे.. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.. आम्हाला आमच्या आहारावर नियंत्रण ठेवण्याची समज द्या.. आमच्यातील इच्छा राम वर नियंत्रित करा.. अती सर्व वर्ज्य करण्याची समज आमच्यात दृढ करा.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद


Share
और पढिये !!

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...