श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Mar 19, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले… वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा… महाराजांची हि वाणी ऐकून सर्व सेवेकरी म्हणाले … महाराज आपण सांगत आहात ती सर्व सेवा आम्ही करू पण.. आपल्या गावात घनपाठी ब्राम्हण नाहीत… महाराज म्हणाले अरे तुम्ही तयारी करा… परमेश्वर स्वतः साह्य करतील .. नक्कीच ब्राम्हण मिळतील… सेवेकरी मंडळींनी सर्व तयारी केली… वर्गणी च्या माध्यमातून साधारण १०० रुपये जमा झाले.. वसंत पंचमी च्या पूजेची तयारी झाली… आता सर्व जण पुरोहितांची वाट पाहू लागले… इतक्यात अचानक काही घनपाठी ब्राम्हण महाराजांकडे आले.. त्यांनी महाराजांना काय सेवा करावी विचारले… तर महाराजांनी आपला मनोदय सांगितला… महाराजांची वाणी ऐकून ते पुरोहित खूप आनंदित झाले आणि त्यांनी वसंत पंचमी ची पूजा वेद घोषात सुरु केली… अश्या रीतीने महाराजांच्या वाणी नुसार पूजा संपन्न झाली… अजूनही बंकटलाल यांचे पूर्वज हि सेवा रुजू करतात… सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयघोष केला !!

बोध – वरील लीला आपणस खूप छोटी वाटते पण बोधाचा खजाना आहे… गुरु आज्ञाचे पालन कसे करावे याचा आपणस बोध होत आहे.. पहा वरील लीलेत श्री महाराजांनी आपला मनोदय सर्व सेवेकरी मंडळींना सांगितला… सेवेकरी मंडळी म्हणाले महाराज आपण सांगाल ती सेवा करण्यास आम्ही तयार आहोत… या ठिकाणी आपणस आपला सेवा भाव कसा असावा याचे दर्शन होते… महाराजांच्या वाणी नुसार सर्व सेवेकरी सेवा करण्यास तयार झाले… आणि साधारण १०० रुपये जमा झाले… त्या काळात १०० रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होय… सर्व सेवेकऱ्यांच्या मनात महाराजांच्या प्रति अतूट श्रद्धा व विश्वास भाव होता… महाराजांनी सांगितले आहे म्हणजे… घनपाठी ब्राम्हण येणारच… त्यासाठी सर्व लोकांनी देखील प्रार्थना केल्या असतील… त्या प्रार्थनेतील भाव देखील शुद्ध होता… त्या मुळेच अचानकपणे वेद पठण करण्यासाठी ब्राम्हण तेथे आले… या ठिकाणी महाराज देखील संदेश देत आहेत कि… पुरोहित म्हणजे जो दुसऱ्याचे हित इच्छितो तो… पुरोहित ( ब्राम्हण) आपणस देखील वरील लीलेचा बोध घेऊन गुरु आज्ञेचे पालन करायचे आहे… आणि महाराजांना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे …!!

चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया … हे समर्था आजची लीला म्हणजे आमच्या साठी गुरु आज्ञेचे पालन कसे करावे याची शिकवण दिलीत… त्या बद्दल धन्यवाद… अनेकदा आमचे मन आमच्या मना प्रमाणे वागण्याचा आग्रह करते… त्यात अनेकदा आमचे हित नसते… आम्हाला तुझ्या आज्ञेचे पालन करण्याची बुद्धी दे… तसेच स्व हिता पेक्षा… सर्वांचे हित होईल असे कर्म करण्याची बुद्धी आम्हाला दे… हे आई हि प्रार्थना करून घेल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...