श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Mar 6, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

उन्हाळ्याचे दिवस होते… श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते…त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता… तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता… आंब्याचे दिवस होते… त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते… महाराजांनी एक दोन आंब्याच्या फोडी खाल्या… अचानक श्री महाराज श्री चंदूमुकीम यांस म्हणाले… चंदू मला आंबे नकोत… तुझ्या घरी उतरंडीला दोन कान्होले ठेवले आहेत ते घेऊन ये… मला ते खायचे आहेत…श्री चंदूमुकीम म्हणाले महाराज कान्होले नाहीत घरी तयार…आपली अनुमती असेल तर मी ताजे कान्होले तयार करून आणतो… श्री महाराज चिडून म्हणाले… गुरूंशी खोटे बोलू नकोस… जा लवकर… उपस्थित लोकांनी चंदू ला सांगितले कि महाराज अंगात आहेत त्या प्रमाणे घरी जाऊन पहा… श्री श्री चंदूमुकीम घरी जाऊन आपल्या पत्नीस सर्व सांगतात… तेव्हा त्यांची पत्नी म्हणते… अहो एक महिन्या पेक्षा जास्त कालावधी झाला आहे.. आपल्या घरात कान्होले नाहीत… ती म्हणाली अहो आपल्या घरात सर्व सामान आहे… मी लगेचच ताजे कान्होले तयार करते… तेव्हा श्री चंदूमुकीम म्हणाले महाराज म्हणत आहेत त्या प्रमाणे तू उतरंडीला तपासून पहा… असे म्हण्टल्या नंतर एकदम तीला आठवेल आणि ती तिच्या पतींना म्हणाली..समर्थ जे म्हणत आहेत ते खरे आहे… अहो मी खापराच्या कळशीत २ कान्होले ठेवले होते… व ती कळशी उतरंडीला ठेवली आहे… परंतु ते कान्होले आत खराब झाले असतील… श्री चंदूमुकीम यांनी उतरंडी वरील ती खापराच्या कळशी काढली… ती कळशी काढून त्यातील कान्होले पाहले तर.. ते कान्होले ताजे तवाने होते.. ते खराब झाले नव्हते… ते कान्होले घेऊन ते लगेच महाराजांकडे जातात… सर्वांना महाराजांच्या वाणीचा अनुभव येतो … सर्वजण एका घोषात महाराजांचा जय जयजय कार करतात !!

बोध – वरील लीला म्हणजे महाराजांच्या अंतःसाक्षीत्वाची अनुभूती देणारी लीला आहे…उपरोक्त लीलेत उतरंडीस कान्होले ठेवले होते… उतरंडी म्हणजे अशी जागा कि सहसा आपले लक्ष जात नाही … खरंतर वरील लीला एक निमित्त आहे आपल्याला समज देण्यासाठी… जसे कान्होले होते घरातच पण त्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते… त्याच प्रमाणे आपल्या मध्ये देखील काही नकारात्मक गुण असतात जे आपल्या मनाने झाकलेले असतात त्याचे आपणस कधी दर्शन होत नाही… महाराज आपल्या जीवनात दुःख संकट देऊन आपणस काम करण्याची संधी देत असतात.. पण जसे वरील लीलेत श्री महाराज श्री चंदूमुकीम यांस सांगत होते उतरंडीस कान्होले आहेत ते मला हवे आहेत… पण श्री चंदूमुकीम यांचे नकारात्मक मन त्यास विरोध करत होते… पण त्यांची भक्ती उच्चतम होती त्यामुळे त्यांना महाराजांच्या अंतःसाक्षित्वाची अनुभूती आली.. आपण हि श्री चंदूमुकीम यांच्या प्रमाणे विरोध करतो… आणि आपल्यातील नकारात्मक सवयी… विचार यावर काम करण्यास तयार होत नाही… आणि आपण आलेले संकट वा दुःख यांस केवळ नकारात्मक विचारांतून पाहतो … त्यामुळे आपल्यातील भक्ती ची पातळी खालावते… खरंतर आपल्या जीवनात जर संकट वा दुःख आले तर आपणस वरील लीलेतील उतरंडी ची आठवण करायची आहे… जी आपणस सांगत आहे… दुःख व संकट फारच कमी आहे… फक्त गरज आहे थोडेसे वरती डोकावून पाहण्याची… जर आपण आपले विचारात सकारात्मकता आणली तर… जसे श्री चंदूमुकीम यांना खापराच्या कळशीत कान्होले सापडले तसे… आपल्या जीवनात देखील यशरूपी कान्होले आपणस प्राप्त होतील… धन्यवाद महाराज … कोटी कोटी धन्यवाद !!
चला आपण त्यासाठी श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था आजची तुझी लीला तर आमच्या साठी दृष्टिदान आहे… आम्ही तर नकारात्मक विचार करतो.. पण वरील लीलेतून तू आम्हास संकटाकडे पाहण्याची दृष्टी दिलीस त्या बद्दल धन्यवाद… इथून पुढे आम्ही प्रत्येक संकटाकडे वा दुःखाकडे नव्या आशेच्या किरणाने पहावे अशी दृष्टी आम्हाला दे… एक संधी म्हणून प्रत्येक संकटाकडे पाहण्याची बुद्धी दे… हे समर्था हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!


Share
और पढिये !!

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...

जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?

!!श्री स्वामी समर्थ!! ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे...

असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।

!!श्री स्वामी समर्थ!! असोनी संसारी जिह्वे वेगु करी । दशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ हरिपाठ www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो....संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली इथे आपणस नामाची महती सांगत आहेत..संसारात असताना नाम घ्या..पहा किती सोपे आहे..हाताने प्रापंचिक कर्म..मुखाने...

हरि मुखे म्हणा.. हरि मुखे म्हणा

!!श्री स्वामी समर्थ!! हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ हरिपाठ पहा नामाचा महिमा..रोज किमान १ माळ स्वामीं नाम जप करूया..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत..मुखाने नाम घ्या..त्या सारखे दुसरे पुण्य...

देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

श्री स्वामी समर्थ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरिपाठ ओवी चिंतन मनन स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची...

खरा कर्ता मी आहे का?

श्री स्वामी समर्थ हे मना मला वाटते की..मी करतो म्हणूनच कार्य होत आहे..पण मी नव्हतो तेव्हाही कार्य सुरू होते..मी नसतानाही कार्य सुरूच असणार आहे..मग मी कसा कर्ता.. कर्ता आणि करविता..तू एक स्वामींनाथा..माझ्यातील कर्ता भाव दूर कर..धन्यवाद समर्था..! www.chetnakeswar.com...

आपले विचार इतरांवर लादू नका!

!!श्री स्वामी समर्थ!! हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..! स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत...

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रोज ११ वेळेस म्हणा

!! श्री स्वामी समर्थ !! स्वामी भक्तहो कोणतीही आर्थिक समस्या नसून आपल्या विचारातील मानसिकता आहे.. आपल्या अंतर्मनातील विचार आहेत.. चला आपले विचार बदल्या.. खालील विचार रोज १ वेळेस किंवा ११ वेळेस म्हणा पहा काय बदल घडतात.. धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद !! हे मना मला...

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस.

स्वामी वाणी पुष्प ५९३(पर्व ४ थे भाग ९७) प्रेरणादायी बोल प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस..अरे विश्वास ठेवा !! प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात.. स्वामींची सम्पूर्ण शक्ती असते..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. स्वामी महाराज आजच्या...

यशाला कधीच शॉर्टकट नसतो.

स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५) प्रेरणादायी बोल हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच...