यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

Jan 16, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९
प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले… असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून…दे रे हरी पलंगावरी… असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही… कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते… कर्म न करणारे मनुष्य श्री रामदास स्वामींना करंटे वाटतात…श्री रामदास स्वामी आपणस कर्म कसे असावं याची शिकवण देत आहेत… समर्थ सांगत आहेत… सर्वप्रथम आपणास आपल्या मनाला शिकवण देणे आवश्यक आहे… म्हणजेच आपल्याला आपल्या मनावर कार्य करणे आवश्यक आहे…कारण मन हे सर्व गोष्टीचे कारक असते त्यामुळे आपणस मनावर कार्य करणे आवश्यक आहे… कार्य कोणतेही असो लहान असो व मोठे असो आपणस कर्म करणे आवश्यक आहे… मग ते कर्म करत असताना काही गोष्टी आवश्यक असतात… माणसाने सदैव तत्पर असणे आवश्यक आहे… काम कोणतेही असो आपण ते सुरु केल्या पासून ते पूर्ण होई पर्यंत न थांबता प्रयत्न करत राहणे खूप महत्वाचे असे आहे..  त्या शिवाय कामात यश प्राप्त होऊ शकत नाही… आळस पूर्णपणे सोडून देणे आवश्यक आहे.. अनेकदा आपले मन निराश होते कारण आपणस यश येत नाही… तरी देखील आपणस न थांबता न थकता प्रयत्न सुरु ठेवणे आवश्यक आहे… त्यानंतर आपणस आपल्या जीवनात काही बदल करणे आवश्यक आहे… रोज सकाळी लवकर उठावे… उठल्या नंतर प्रथम भगवंताचे नामस्मरण करावे… प्रातः कर्मे प्रथम पूर्ण करावेत… रोज काही तरी नवीन पाठ करावे… नवीन शिकावे… रोज त्याची उजळणी करावी.. असे होऊ नये पुढचे पाठ मागचे सपाट… नंतर थोडासा फलाहार घ्यावा… त्यानंतर आपण जे काही नोकरी.. व्यवसाय करत असाल त्यास सुरवात करावी… महाराज सांगतात… आपले अक्षर सुंदर असावे… वाचन सुद्धा स्पष्ट असावे… शुद्ध असावे… आपणस एखाद्या विषयाची काही अडचण असेल तर त्या बाबत आपण तज्ञ् व्यक्तींना विनासंकोच विचारावे… असे नाही कि मी कसे विचारू…आपले अज्ञान लपवू नका… त्याच प्रमाणे आपल्या कडे कुणी आले तर त्याचे समाधान देखील पण करावे.. पण त्याला चुकीचे मार्गदर्शन करू नये…रोज काही तरी आध्यात्मिक ग्रंथाचे वा चांगले साहित्य वाचावे… नुसते साहित्य वाचू नये तर त्यावर स्व चिंतन करावे… स्व चिंतन करून समजले नाही तर त्यातील तज्ञ् व्यक्तींना विचारावे… शक्य असेल तर आपण आपले आध्यत्मिक ज्ञान वा चांगले ज्ञान इतरांना द्यावे परंतु ते सत्य असावे खोटे नसावे… आपले आचरण हे सत्य असावे… म्हणजेच आपण जसे बोलतो तसेच आपले कर्म असावे… म्हणजेच बोले तैसे वागे.. त्याची वंदावी पाऊले । आपले आचरण असे असावे कि ज्याचा इतरांना त्रास होऊ नये.. या सर्व गोष्टी बरोबर महाराज महत्वाची गोष्ट सांगत आहेत…आपल्या ह्रदयात जो भगवंत आहे त्याचे नेहमी ध्यान… चिंतन करण्याचा अभ्यास करावा… अश्या पद्धतीने जर आपले कर्म असेल तर नक्कीच एक दिवस आपणस यश प्राप्त होते यात कोणतीच शंका नसावी.
नक्कीच आपण श्री दासबोध ग्रंथाचा अभ्यास करावा… जय जय रघुवीर समर्थ !
चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था आज जी आपण आम्हाला यत्नशिकवण दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आज पर्यंत आम्ही दैववादी होतो… परंतु आज तुम्ही आम्हाला प्रयत्न वादाची… कर्माची शिकवण दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. आमच्या मनाला सदैव हि शिकवण स्मरणात रहावी… जो पर्यंत यशाची प्राप्ती होत नाही तो पर्यंत न थांबता.. न थकता.. प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा आम्हाला दे… आणि तू जो ह्रदयात स्थित आहेस… त्यावर माझे चित्त स्थिर कर… धन्यवाद समर्था… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद ! जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...