जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

Jan 4, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच

श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते… श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी मिळाली होती… श्री विठोबा घाटोळ हे महाराजांची सेवा करत होते परंतु अंतर्मनात वेगेळेच विचार सुरु होते… मनात अहंकार… खोटी भक्ती … लालसा होती … महाराजांची सेवा थोडीच करत परुंतु दिखाऊ पण जास्त करत.. तो सर्वाना सांगत असे कि समर्थांच्या सेवेचे काम माझ्याशिवाय होत नाही… महाराज माझा शब्द कधीच टाळत नाहीत… इतर भक्तांवर तो हुकूम गाजवण्याचे काम करत असे… हे सर्व महाराजांना माहित होते परंतु महाराज त्या कडे दुर्लक्ष करत… एके दिवशी काही बाहेरगावची मंडळी श्री महाराजांच्या दर्शनासाठी आली होती… परंतु त्यावेळी महाराज आराम करत होते… महाराजांना उठवण्याची कुणाची हिम्मत नव्हती.. सर्वांना प्रश्न पडला कि महाराजांना कुणीत उठवावे… त्यावेळी अनेकांनी श्री विठोबा घाटोळ यांचे नाव सुचवले… त्या बाहेरगाव वरून आलेल्या भक्तांनी श्री विठोबा घाटोळ यांना विनंती केली…आणि त्यांची विनंती व स्तुति ऐकून ते भारावून गेले… अहंकार जागृत झाला…आणि ते श्री महाराजांकडे गेले…श्री महाराजांना सर्व हकीकत सांगितली व आपण त्या लोकांना दर्शन द्यावे अशी विंनती केली… महाराजांकडे एक काठी होती ती घेऊ ते बाहेर आले… आलेल्या भक्तांना दर्शन दिले… दर्शन घेऊन बाहेरगांव वरून आलेले भक्त निघून गेले… ते भक्त निघून जाताच श्री महाराजांनी श्री विठोबा घाटोळ यांस तिथे उपस्थित लोकांसमोर काठीने बदडून काढले… महाराजांचा मर खाल्ल्या नंतर श्री विठोबा तिथून पळून गेला तो परत काही श्री महाराजांकडे आला नाही … बोला श्री गजानन महाराज कि जय !! 

बोला || अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध -खरंतर वरील लीला म्हणजे आपल्या साठी डोळ्यातील अंजन आहे म्हणावे लागेल… पहा श्री विठोबा घाटोळ यांची पूर्वपुण्याई होती म्हणूनच त्यांना श्री महाराजांचा सहवास व सेवा करण्याचे भाग्य लाभले… परंतु त्यांच्यातील अहंकार व लोभी वृत्ती मूळे त्यांना त्या सेवेचा लाभ घेता आला नाही व परब्रम्हाच्या सेवेस ते मुकले… इथे आपणस हा सुद्धा बोध होतो पहा ना श्री महाराज आराम करत होते तरीही जे भक्त त्यांच्या दर्शन साठी आले होते… त्याची श्री महाराजांवर इतकी श्रद्धा होती कि श्री महाराज त्यांना दर्शन देण्यासाठी तात्काळ आले… इथे श्री महाराजांनी श्री विठोबा घाटोळ यांना काठीने मारले… खरे तर महाराजांचा मार हा आपल्यातील चुकीच्या वृत्ती काढून टाकण्यासाठी असतो… आहे हे श्री विठोबा घाटोळ यांना समजले नाही…जसे हे त्यांना समजले नाही तसेच अनेकदा आपल्याही बाबतीत होत असते… अनेकदा आपल्याकडून जेव्हा काहीचुका होतात तेव्हा श्री महाराज इतरांना माध्यम बनवून आपल्याला मार वा समज देत असतात … कारण महाराजांना आपल्यातील चुकीच्या समजुती… आपल्यातील दिखाऊपणा घालवून आपल्यातील भक्ती वाढवायची आहे… परंतु नेमके आपण सुद्धा अनेकदा या गोष्टीला विरोध करतो आणि श्री विठोबा घाटोळ यांच्या प्रमाणे सेवा सोडून इतरत्र अडकतो… आपणस यावर स्व चिंतन… करण्याची नितांत गरज आहे… चला तर मग आपण त्या साठी श्री महाराजांना प्रार्थना करूया ..
प्रार्थना – श्री गजानन महाराज आमची देखील पुण्याई म्हणून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे… अनेकदा तू माझी प्रगती व्हावी यासाठी… इतरांच्या मार्फत शब्दरुपी काठी द्वारे व अन्य मार्गाने तू आमच्यातील… ढोंगीपणा… दिखाऊपणा… जावा यासाठी मला मदत करत असतेस परंतु माझ्यातील अहंकारी मन याला विरोध करते… आई माझी इतकीच प्रार्थना आहे कि माझ्या मनाने कितीही विरोध करू दे परंतु तू मला सॊडू नकोस कारण माझे भले कश्यात आहे हे मला समजत नाही… धन्यवाद आई… कोटी कोटी धन्यवाद

 

 


Share
और पढिये !!

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...