श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

Jan 2, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

 

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३
भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा
श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते…ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते… घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची तब्येत बिघडली… त्याची तब्येत इतकी खराब झाली कि त्यांनी अंथरुनच धरले…अनेक वैद्य त्याचे उपचार करत होते परंतु दिवसेंदिवस तब्येत आणखीनच खराब होत होती…अनके वैद्य आपले प्रयन्त करत होते परंतु कुणालाच यश येत नव्हते… शेवटी वैद्यांनी सांगितली कि आता यांच्यावर काहीच उपचार होऊ शकत नाहीत… सर्वांनीच आशा सोडून दिली.. त्यातील काही जणांनी सुचवले कि… आपण श्री गजानन महाराज त्यांच्याकडे जाऊन त्याना मार्गदर्शन मागावे… नक्कीच काही तरी मार्ग मिळेल… मग उपस्थित लोक पैकी एक जण श्री गजानन महाराजांकडे गेले.. तेव्हा श्री महाराज बंकटलाल त्यांच्या घरी होते … त्यानी श्री बंकटलाल यांना सर्व काही सांगितलं व विनंती केली कि आपण श्री महाराजांना विनंती करून त्यांचे चरण तीर्थ जानराव त्यांच्यासाठी द्यावे… बंकटलाल यांनी सांगितले कि हे काम मी करू शकत नाही… आपण माझ्या वडिलांशी बोलून पाहावे… ते श्री भवानीराम यांच्याशी बोलले… त्यांना सर्व वृत्तांत सांगितला… सर्व वृत्तांत ऐकून भवानीराम यांचे ह्रद्य द्रवित झाले… ते श्री महाराजांकडे गेले… त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व विनंती केली जर आपण आपले चरण तीर्थ दिलेत तर आम्हाला विश्वास वाटतो कि श्री जानराव यांची तब्येत नक्कीच सुधारेल… श्री महाराज यांनी चरणतीर्थ देण्याची परवानगी दिली… श्री च्या चरण तीर्थाने जानराव यांची तब्येत सुधारली आणि ते पूर्णपणे बरे झाले व आठ दिवसातच ते श्री महाराजांच्या दर्शनास गेले… हे सर्व पाहून उपस्थित सर्वांनी श्री महाराजांचा जय जय कार केला . बोला श्री गजानन महाराज कि जय
बोला || अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – वरील लीलेतून आपणस खूप खोल असा संदेश प्राप्त होत आहे..
श्री जानराव देशमुख यांच्याकडे आर्थिक सुबत्ता होती…अनेक वैद्य त्याच्यावर उपचार करत होते… परंतु कोणत्याच वैद्याला यश प्राप्त होत नव्हते… सर्वांनी आशा सोडून दिली…परंतु त्यात काही लोक असे होते कि ज्यांचा विश्वास हा उच्च होता… या ठिकाणी आपणस श्रद्धा आणि भक्ती चा भाव समजवून घ्यायचा आहे… आपणस कुठेही अंधश्रद्धा ठेवून भक्ती करायची नाहीये… वरील लीला हि त्या वेळेनुसार आहे… आज जर आपण आजारी असाल तर आपणस योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यायचे आहेत.. वरील लीलेत बंकटलाल यांना सर्व काही सांगितले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांशी बोलण्यास सांगितले… म्हणजेच इथे आपणस त्यांची श्री महाराजांवर जी श्रद्धा होती… ती किती वरच्या पातळीवर होती… त्याना महाराजांना अश्या प्रकारे प्रश्न विचारणे चुकीचे वाटले…. भवानी राम यांनी सुद्धा श्री महाराजांना सर्व हकीकत सांगितली… व त्यांच्या परवानगी नंतर चरण तीर्थ दिले… इथे चरण तीर्थ हे… आपल्यातील विश्वासाचे प्रतीक आहे… पहा श्री जानराव देशमुख श्री महाराजांच्या चरण तीर्थाने पूर्णपणे बरे झाले… इथे चरण तीर्थ म्हणजे विश्वास..पहा आपण अनेकदा डॉक्टरांकडे जातो… डॉक्टर आपणस औषध देतात जर आपला डॉक्टरांवर विश्वास असेल तर आपणस एकाच दिवसात फरक जाणवतो… इथे औषध काम करतेच पण आपल्यातील डॉक्टरांवरील विश्वास काम करतो व आपणस बरे वाटण्यास सुरवात होते.. थोडक्यात आपला विश्वास आपणस वाढवायचा आहे.
चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया -श्री गजानन महाराज आपली लीला म्हणजे आमच्यासाठी विश्वास रुपी औषध आहे… आमचे मन कायम प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करते..श्री .जानराव यांच्या जीवनात जसे सकारात्मक लोक आले तसे सकारात्मक विचारांचे लोक आमच्या जीवनात येऊ द्या…आमच्या जीवनात प्रत्येक क्षणाला थोडे थोडे विश्वास रुपी चरण तीर्थ आम्हाला मिळावे जेणेकरून प्रत्येक परिस्थिती आमच्यातील श्रद्धा विश्वासाची पातळी उच्चत्तमच असेल… धन्यवाद महाराज… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !!


Share
और पढिये !!

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...