नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 19, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात
” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें |
नामस्मरण भक्ति हि खूपच सुंदर अशी भक्ती आहे… हि भक्ती करण्यासाठी आपल्याला कोणत्याही सामुग्रीची आवश्यकता लागत नाही…उपरोक्त श्लोका द्वारे रामदास स्वामी सांगत आहेत… भगवंताचे स्मरण करावे रोज नित्यनेमाने , प्रातः ककाळी , दुपारी , आणि सायंकाळी नामस्मरण करावे… शिवाय जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करावे… ज्या पण कोणत्या देवावर आपली श्रद्धा असेल त्या भगवंताचे आपण नामस्मरण भक्ति आपण करू शकतो… जसे आपली भगवान श्री कृष्णावर श्रद्धा असेल तर आपण ” ओम नमो भगवते वासुदेवाय… थोडक्यात आपली ज्या देवावर आपली श्रद्धा असेल त्या देवाचे नामस्मरण रुपी सेवा आपण करावी… अनेकदा आपल्या मनात प्रश्न असतो कि नामस्मरण कधी करावे… याचे उत्तर आपणस समर्थ रामदास स्वामी यांनी आपणस दिले आहे कि रोज ना चुकता भगवंताचे नामस्मरण करावे… सकाळी उठले कि … दुपारी… संध्याकाळी तसेच आपणस जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अखंड नामस्मरण रुपी भक्ती करावी… या साठी कोणतेही बंधन नाहीये कि अमुक अश्या अवस्थेतच जप करावा…हा भगवंताच्या भक्तीचा खूप सुंदर असा मार्ग आहे… ज्याप्रमाणे आपला श्वास अखंड चालू आहे त्या प्रमाणे आपली नाम रुपी सेवा सुरु असली पाहिजे… या मुळे आपणस आपल्या मनास नाम रुपी सेवेची सवय लावायची आहे… सर्वांना नक्कीच विनंती आहे कि रोज किमान १ माळ आपली ज्या कोणत्या देवावर श्रद्धा असेल त्याभगवंताचे नाम सेवा करावी… या मध्ये एक गोष्ट महत्वाची कि अमुक एक मंत्रच श्रेष्ठ अशी शंका मनात आणू नये … प्रत्येक नाम हे श्रेष्ठच आहे.

चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था… नाम कधी घ्यावे हि समज तू आज आम्हाला दिलीस…आमचे मन अनेकदा अनेक मंत्राचा जप करते कारण… मनाला असे वाटते कि हा मंत्राचा जप केला तर अमुक फायदा होईल… आणि या कारणाने नामस्मरण भक्ति चा जो खरा फायदा मिळवायचा आहे त्यापासून आम्ही दूर जातो… आमची हीच प्रार्थना आहे कि एक नामावर आम्हाला स्थिर कर… धन्यवाद स्वामी… कोटी कोटी धन्यवाद.. !
जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...