पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 12, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

पादसेवन भक्ती – श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि –

पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन ।
श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे –
भगवंताच्या प्राप्ती साठी काया, वाचा, मनाने आणि आपलेपणाने सद्गुरूंची चरण सेवा करावी. सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणे म्हणजे पादसेवन भक्ती !
नवविधा भक्ती मधील चौथा प्रकार आहे पादसेवन भक्ती । पादसेवन भक्ती चे रामदास स्वामींनी खूप विस्तार पूरक वर्णन दासबोध मध्ये केले आहे… वरील श्लोकातून महाराज  सोप्या भाषेत पादसेवन भक्ती चे वर्णन करत आहेत… सद्गुरूंचे पाय सेवावे… सद्गुरू आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे सद्गुरू असणार… श्री स्वामी समर्थ महाराज , श्री गजानन महाराज, संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली वा अन्य कोणते आपले सद्गुरू असतील… त्यांची काया… वाचा… मनोभावे सद्गुरूंची पाद्य सेवा करावी… काया म्हणजे शरीराने सेवा करायची … शरीराने सेवा म्हणजे आपणस काय शरीराला त्रास द्यायचा आहे का? नाही आपणस शरीर साक्षात परमेश्वर या भावनेने आपणस सेवा करायची आहे… कारण आपले शरीर जर तंदुरुस्त असेल तरच आपण सद्गुरूंची सेवा करू शकतो… कारण शरीर जर व्यवस्थित नसेल तर आपण कशी सेवा करणार… त्यामुळे आपणस सर्वप्रथम आपले शरीर सद्गुरु सेवेसाठी निरोगी ठेवणे आवश्यक आहे.. जेणेकरून आपण सद्गुरूंची जी सेवा असेल ती करू शकू… आता या ठिकाणी आपली जी वाचा आहे तिने सद्गुरु ची सेवा करायचा उपदेश इथे समर्थ करत आहेत… पहा हि वाचा आपणस उच्च स्थान पण देऊ शकते व नीच स्थान पण देऊ शकते… आपण तिचा कसा वापर करतो यावर ते अवलंबून आहे… आता वाचेने सदगुरूंची सेवा म्हणजे आपणस जी काही ग्रंथ संपदा उपलब्ध आहे त्याचे आपणस वाचन करायचे आहे… जसे तुकाराम गाथा असेल , दासबोध असेल , ज्ञानेश्वरी असेल यांचे आपणस मनसोक्त वाचन करायचे आहे… जेणेकरून आपणस सद्गुरू आपणस जो बोध देऊ इच्छितात तो आपणस समजेल…तोच बोध आपण आपल्या वाचे द्वारे इतरांना सांगू शकता हि देखील सद्गुरूंची सेवा होणार आहे …हि सर्व सेवा झाली कि एक अवस्था अशी येईल कि आपण आपल्या मनाद्वारे… सद्गुरूची मानस पूजा करू… पण हि अवस्था येण्यासाठी आपणस खूप सेवेची भक्ती ची अवस्था प्राप्त करून घेणे आवश्यक आहे… त्या साठी आपण सदगुरूंच्या प्रत्येक आज्ञा चे पालन करणे आवश्यक आहे… त्यावर आपणस चिंतन मनन करणे आवश्यक आहे…तेव्हाच आपल्याकडून परिपूर्ण अशी पादसेवन भक्ती होईल.
चला आपण सद्गुरू श्री रामदास स्वामींनाच या साठी प्रार्थना करूया

हे समर्था… आज तु आम्हाला पादसेवन भक्ती म्हणजे काय याची ओळख करून दिलीस… खरे तर हे तुम्ही जे काही सांगितले हे वाचन करताना… आम्हाला असे वाटते कि आम्हाला हे समजले आहे… परंतु रोजच्या कर्मात आम्ही आपली हि शिकवण विसरून जातो…पादसेवन भक्ती करायची असेल… त्या भक्ती मध्ये स्थिर होण्यासाठी आपलीच कृपा आवश्यक आहे… हे आई… तुला हीच प्रार्थना आहे कि आमची भक्ती वाढव…आम्हाला आपली पादसेवन भक्ती प्राप्त व्हावी हीच प्रार्थना… धन्यवाद समर्था !!


Share
और पढिये !!

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...