आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 7, 2021 | Uncategorized

Share

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत
मागें एक पुढे एक ।
ऐसा जयाचा दंडक
बोले एक करी एक ।
तो एक पढत मूर्ख ।।
रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते… एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट आपणस पटली नाही कि आपण तिच्या मागून… तिच्या विषयी चर्चा करतो … मग आपण सारासार विचार न करता त्या व्यक्तीला मूर्ख म्हणतो.. पण खरोखर ती व्यक्ती मूर्ख आहे कि आपणच मूर्ख आहोत… कारण ज्या व्यक्ती विषयी आपण बोलत आहोत… ती व्यक्ती समोर नाही तरी देखील आपण तिच्या विषयी नकारात्मक बोलत असतो… नक्की आपण स्वतः ला च तर मूर्ख बनवत आहोत कि नाही… आपणच विचार करावा… समर्थ सांगतात… ज्या व्यक्ती विषयी आपण मागून टीका करतो… तीच व्यक्ती समोर असेल तर आपण तिची खोटी स्तुति करतो…खरंच आपण त्याला मूर्ख बनवत नाही तर आपणस स्वतःच आपण मूर्ख बनवतो पण हे आपल्याला समजतच नाही… आपण मराठीत एक म्हण ऐकिली आहे… बोले तैसा वागे … त्याचे वंदावे पाऊले… या विषयी समर्थ सांगतात कि… लोकांशी बोलताना एक बोलतो व प्रत्यक्ष कृती करताना मात्र आपण त्याच्या विरुद्ध कृती करतो… जसे आपणस व्यायामाचे महत्व माहित आहे… म्हणून आपण इतरांना त्याचे इतके महत्व सांगतो कि… त्या व्यक्ती ला वाटते खरंच हा एक उत्कृष्ट व्यायाम पटू असेल… प्रत्यक्षात आपण कधीच व्यायाम करत नाही… मग हा मूर्खपणा नाही का ? पहा समर्थानी एका श्लोकात आपल्यातील मूर्खपणाचे दर्शन आपणस करून दिले आहे… यावर आपण स्वतः चिंतन करावे .
चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था तू आज आम्हाला आमच्यातील एक मूर्खपणा दाखवला त्याबद्दल धन्यवाद… आम्हीं जेव्हा तो वाचतो तेव्हा तो छान वाटतो… पण मनावरच्या मूर्खपणाच्या सवयी मुळे आम्हाला आमचा मूर्खपणा कधीच दिसत नाही… आजचा हा श्लोक आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनव… जेणेकरून… आम्हाला आमच्यातील मूर्खपणा जाणवेल… आणि मूर्ख पणा आमच्यातून हळूहळू नष्ट व्हावा असा आम्हाला आशीर्वाद द्या… धन्यवाद समर्था … कोटी कोटी धन्यवाद ! जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...