भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

Nov 28, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा – नामाचा महिमा अगाध आहे… खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून श्रीलंकेत जायचे होते… जाण्यासाठी मार्ग होता समुद्र मार्ग… इतके अंतर जाण्यासाठी रस्ता आवश्यक होता..आता काय करावे हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला… मग वानर सेनेनं समुदात दगडे टाकण्यास सुरवात केली… परंतु किती दगडे टाकली तरी ती सर्व पाण्यात जाऊन खाली बसत होती… आता काय करावे हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहिला.. तितक्यात पवन पुत्र श्री हनुमान यांच्या ह्रद्यातून विचार आला कि आपण दगडावर “श्री राम” लिहून दगड पाण्यात टाकावा.. असा विचार करून त्यांनी दगड पाण्यात टाकला असता तो दगड पाण्यावर तरंगू लागला.. हे पाहून सर्व वानर सेनेने… “श्री राम” हा मंत्र लिहून पाण्यात दगडे टाकण्यास सुरवात केली… ती सर्व दगडे पाण्यावर तरंगू लागली.. रस्ता तयार होऊ लागला… हे सर्व पाहून प्रभू श्री रामचंद्राना देखील वाटले आपण सुद्धा श्री राम लिहून दगड पाण्यात टाकावा… त्यानी सुद्धा पाण्यात दगड टाकला.. पण तो दगड पाण्यात बुडला… हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.. तेव्हा पवन पुत्र हनुमान म्हणाले… स्वामी आपण टाकलेले दगड नाही तरणांर कारण… आपण ज्याला धरता तो भवसागर पार होतो.. पण आपण ज्याला सोडता तो हा भावसागर तरु शकत नाही … म्हणजेच ज्याच्या मुखात नाम आहे तो या भवसागरात तरतोच… अश्या रीतीने राम नामाने श्री राम सेतूची निर्मिती झाली… तश्याच सेतू ची निर्मिती आपल्या जीवनात होईल जेव्हा आपण नाम रुपी साधना सातत्याने करू … हा आहे नाम महिमा.

चला तर मग आपण पवनसूत हनुमंतालाच प्रार्थना करूया… हे पवनसुता… आपली श्री राम नामावर इतकी श्रद्धा होती कि… आपण राम नामाचा मार्ग रुपी सेतू निर्माण केलात.. ज्या प्रमाणे आपल्या मुखात अखंड राम नाम होते… त्या प्रमाणे आमच्या मुखात भगवंताचे नाम यावे… नाम महिमा आम्हाला समजावा.. आमच्या ह्रद्यातून नामच यावे… आणि हृदयातील भगवंताची आम्हला ओळख व्हावी… हे पवन सुता हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...