श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

Nov 25, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री महाराज ह्यांच्या दर्शनाची वाट पाहत होते त्यांना सगळीकडे श्री गजानन महाराज आहेत असे वाटत होते त्यांच्या मनाची ही अवस्था ते कोणाला सांगू पण शकत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारले की,बाळा काय झाले आहे तुला?काही चिंता तुला भेडसावत आहे काय ?तुझी तब्येत तर ठिक आहे ना. त्यांनी वडिलांना सगळे ठिक आहे असे सांगितले परंतु त्यांचा शोध चालूच होता त्यांच्या घरा जवळच श्री रामाजी पंत देशमुख नावाचे वयस्कर गृहस्थ राहत होते ते खूप थकलेले होते त्यांना श्री बंकटलाल ह्यांनी श्री महाराज ह्यांच्या विषयी सांगितले तेव्हा त्यांनी बंकटलाल ह्यांचे शब्द ऐकल्यावर ते म्हणाले की ते कोणी संत महात्मा असणार अशातच चार दिवस निघून गेले श्री बंकटलाल ह्यांच्या मनात ते चालूच होते त्या दिवशी गावात श्री गोविंद बुवा टाकळीकर नावाचे मोठे किर्तनकार आले होते आणि त्याचे त्या दिवशी तेथे किर्तन होते त्यांच्या किर्तनाला श्री बंकटलाल गेले होते तेथे त्यांचा मित्र पितांबर आला होता त्या दोघांची तेथे भेट झाली तेव्हा श्री बंकटलाल ह्यांनी त्यांना श्री गजानन महाराज ह्यांच्या विषयी सांगितले त्याचवेळी श्री बंकटलाल ह्यांना श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

 

बोध -वरील लीलेतून आपल्याला असा बोध होतो की ,तो म्हणजे आपली श्रद्धा ,भक्ती असेल तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळते तिच आपल्यासाठी चांगली शिकवण आहे हेच पाहणा ,श्री बंकटलाल ह्यांचा विश्वास इतका दृढ होता की एकाच भेटीत त्यांची श्री महाराजांवर श्रद्धा बसली होती… त्यांची श्री महाराज ह्यांच्या दर्शनाची आस इतकी दृढ होती की त्यांना चार दिवसात परत श्री महाराजांचे दर्शन झाले… येथे अजून एका  गोष्टींचा आपल्याला बोध होतो तो म्हणजे श्री बंकटलाल ह्यांच्या कडून तो असा की ,आपण आपल्या वडिलांचा आदर केला पाहीजे . येथे पहा की ,त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारले की काही समस्या आहे का?परंतु बंकटलाल ह्यांनी त्यांना काही त्रास नको म्हणून त्यांना आदरपूर्वक सांगितले की काही समस्या नाही आहे त्या नंतर त्यांनी श्री गोविंद बुवा ह्यांना सगळी गोष्ट सांगितली तर त्यांनी सकारत्मक भावाने त्यांना सांगितले की ते कोणी महान पुरुष असतील त्यांच्या तोंडाने ही  गोष्ट ऐकल्यावर तर त्यांची श्रद्धा खूप वाढली त्यानंतर त्यांनी खुप पार्थना केली असेल आणि त्याचाच परिणाम म्हणा असे झाले की ,त्यांना श्री ब्रह्मांड नायक गजानन महाराज ह्यांचे दर्शन प्राप्त झाले बोला श्री गजानन महाराज ह्यांचा जयजयकार असो  त्यांची दर्शनाची इच्छा पूर्ण झाली बोला श्री गजानन महाराजांचा जयजयकार असो

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

प्रार्थना -हे ब्रह्मांड नायका आज आपण आम्हाला आजच्या लीलेच्या माध्यमातून जो भक्ती,श्रद्धा,आणि विश्वास याची शिकवण दिली त्याबद्दल धन्यवाद इतकी श्रद्धा,भक्ती,आणि विश्वास आमच्या मनात जागवा की जेणेकरून आपल्या लिलांचा अर्थ आम्हाला समजला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी पात्र असू ही प्रार्थना करून घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद


Share
और पढिये !!

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...