श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

Nov 18, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

आपले गजानन महाराज बोलत आहेत – हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही.
श्री गजानन महाराज लीला – श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले… आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार असा विचार श्री बंकटलाल व श्री दामोदर यांच्या मनात आला… श्री महाराज यांच्या जवळ पाणी पिण्यासाठी भांडे होते परंतु त्यात पाणी नव्हते… तेव्हा श्री दामोदर यांनी श्री महाराजांना विनयपूर्वक विचारले… महाराज आपणस पिण्यासाठी पाणी आणू का ? श्री महाराज यांनी त्यांच्याकडे पहिले आणि हसले… आणि म्हणाले… आपणास आवश्यकता वाटत असेल तर जरूर पाणी आणावे… जगाच्या व्यवहारानुसार जेवण केल्यानंतर पाणी पिणे आवश्यक आहे… श्री महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे दामोदर घरात पाणी आणण्यासाठी जातात… तिथे गाई… म्हशी.. घोडे तसेच इतर पाळीव प्राण्यासाठी पाणी पिण्यासाठी एक हौद होता… श्री महाराज तिथे गळे व त्यांनी तेच पाणी ग्रहण केले… हे सर्व पाहून सर्व लोक आश्चर्य चकित झाले… दामोदर पाणी घेऊन येऊ पर्यंत श्री महाराजांनी पाणि ग्रहण केले होते… हे सर्व पाहून दामोदर श्री महाराजांना म्हणाले.. श्री महाराज ते पाणी अशुद्ध आहे.. ते पाणी प्राणी पितात… मी तुमच्या साठी माठातील शुद्ध व थंड पाणी घेऊन आलो आहे… तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले… या सर्व व्यवहारिक गोष्टी मला सांगू नका … हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही… पाणी हे पाणीच असते… पाणी आणि पाणी पिणारा वेगळा नाही… श्री महाराज यांची हि वाणी ऐकून बंकटलाल आणि दामोदर दोघेही श्री महाराज यांचे चरण स्पर्श करण्यासाठी पुढे आले.. परंतु श्री महाराज वायू वेगाने तिथून निघून गेले… बोला श्री गजानन महाराज कि जय !
!! गण गण गणात बोते !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – श्री गजानन महाराज वरील लीलेतून खूपच खोल असा बोध देत आहेत… पहा ना श्री महाराज यांचे जेवण झाल्यानंतर श्री दामोदर यांनी श्री महाराजांना पाणी पिण्याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले कि जगाच्या व्यवहारा नुसार पाणी पीले पाहिजे… पहा ना यात पहा खूप खोल संदेश आहे… ते तर ब्रम्हांड नायक आहेत तरीही… जगाच्या व्यवहारा नुसार त्यांनी पाणी ग्रहण केले… आपणस सुद्धा संसार करताना… सर्व गोष्टींची पूर्तता करायची आहे… असे नाही कि फक्त आध्यात्मिकता किंवा संसार करायचा आहे… आपणस सर्व गोष्टीत एकरूपता आणायची आहे… जसे पाणी दुधात एकत्र केले तर दुधाचा रंग धारण करते… म्हणजे ज्यात मिळवले जाते त्याचे रूप धारणा करते… अगदी तसेच आपणस संसारात राहताना आपले कर्म करायचे आहे…एखाद्या कामाची पूर्तता झळाई कि त्यात अडकायचे नाही.. आपणस आपल्या मनाला पाण्याप्रमाणे निर्मळ… शुद्ध बनवायचे आहे… इथे महाराज पाण्याचे महत्व पण सांगत आहेत… पण यावर आपण पुढे चिंतन करूया…

चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… श्री गजानन महाराज आपण आजच्या लीलेला माध्यम करून जो आम्हाला बोध दिलात त्याबद्दल धन्यवाद… पाण्याप्रमाणे आमचे मन सुद्धा शुद्ध करा… निर्मळ करा… या मनावर कायम तुमच्या नामाची जादू असावी… जेणेकरून आम्हाला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल… आमच्या मनावरील चुकीच्या धारणा दूर करा… जेणेकरून तुम्ही आम्हाला जे ज्ञान देऊ इच्छिता त्यासाठी आम्ही पात्र बनू… ! … धन्यवाद महाराज .. कोटि कोट धन्यवाद

 


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...