श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

Nov 18, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

आपले गजानन महाराज बोलत आहेत – हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही.
श्री गजानन महाराज लीला – श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले… आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार असा विचार श्री बंकटलाल व श्री दामोदर यांच्या मनात आला… श्री महाराज यांच्या जवळ पाणी पिण्यासाठी भांडे होते परंतु त्यात पाणी नव्हते… तेव्हा श्री दामोदर यांनी श्री महाराजांना विनयपूर्वक विचारले… महाराज आपणस पिण्यासाठी पाणी आणू का ? श्री महाराज यांनी त्यांच्याकडे पहिले आणि हसले… आणि म्हणाले… आपणास आवश्यकता वाटत असेल तर जरूर पाणी आणावे… जगाच्या व्यवहारानुसार जेवण केल्यानंतर पाणी पिणे आवश्यक आहे… श्री महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे दामोदर घरात पाणी आणण्यासाठी जातात… तिथे गाई… म्हशी.. घोडे तसेच इतर पाळीव प्राण्यासाठी पाणी पिण्यासाठी एक हौद होता… श्री महाराज तिथे गळे व त्यांनी तेच पाणी ग्रहण केले… हे सर्व पाहून सर्व लोक आश्चर्य चकित झाले… दामोदर पाणी घेऊन येऊ पर्यंत श्री महाराजांनी पाणि ग्रहण केले होते… हे सर्व पाहून दामोदर श्री महाराजांना म्हणाले.. श्री महाराज ते पाणी अशुद्ध आहे.. ते पाणी प्राणी पितात… मी तुमच्या साठी माठातील शुद्ध व थंड पाणी घेऊन आलो आहे… तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले… या सर्व व्यवहारिक गोष्टी मला सांगू नका … हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही… पाणी हे पाणीच असते… पाणी आणि पाणी पिणारा वेगळा नाही… श्री महाराज यांची हि वाणी ऐकून बंकटलाल आणि दामोदर दोघेही श्री महाराज यांचे चरण स्पर्श करण्यासाठी पुढे आले.. परंतु श्री महाराज वायू वेगाने तिथून निघून गेले… बोला श्री गजानन महाराज कि जय !
!! गण गण गणात बोते !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – श्री गजानन महाराज वरील लीलेतून खूपच खोल असा बोध देत आहेत… पहा ना श्री महाराज यांचे जेवण झाल्यानंतर श्री दामोदर यांनी श्री महाराजांना पाणी पिण्याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले कि जगाच्या व्यवहारा नुसार पाणी पीले पाहिजे… पहा ना यात पहा खूप खोल संदेश आहे… ते तर ब्रम्हांड नायक आहेत तरीही… जगाच्या व्यवहारा नुसार त्यांनी पाणी ग्रहण केले… आपणस सुद्धा संसार करताना… सर्व गोष्टींची पूर्तता करायची आहे… असे नाही कि फक्त आध्यात्मिकता किंवा संसार करायचा आहे… आपणस सर्व गोष्टीत एकरूपता आणायची आहे… जसे पाणी दुधात एकत्र केले तर दुधाचा रंग धारण करते… म्हणजे ज्यात मिळवले जाते त्याचे रूप धारणा करते… अगदी तसेच आपणस संसारात राहताना आपले कर्म करायचे आहे…एखाद्या कामाची पूर्तता झळाई कि त्यात अडकायचे नाही.. आपणस आपल्या मनाला पाण्याप्रमाणे निर्मळ… शुद्ध बनवायचे आहे… इथे महाराज पाण्याचे महत्व पण सांगत आहेत… पण यावर आपण पुढे चिंतन करूया…

चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… श्री गजानन महाराज आपण आजच्या लीलेला माध्यम करून जो आम्हाला बोध दिलात त्याबद्दल धन्यवाद… पाण्याप्रमाणे आमचे मन सुद्धा शुद्ध करा… निर्मळ करा… या मनावर कायम तुमच्या नामाची जादू असावी… जेणेकरून आम्हाला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल… आमच्या मनावरील चुकीच्या धारणा दूर करा… जेणेकरून तुम्ही आम्हाला जे ज्ञान देऊ इच्छिता त्यासाठी आम्ही पात्र बनू… ! … धन्यवाद महाराज .. कोटि कोट धन्यवाद

 


Share
और पढिये !!

आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !!

स्वामी वाणी पुष्प ५३४(पर्व ४ थे भाग ३८) आजचे चिंतन-मनन हे मना ! आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !! क्षणोक्षणी काळजी घेती भक्ताची ! ही गुरूमाऊली !! www.SwamiVaani.com या ओवीतून स्वामीं नी आपल्या मनावर प्रहार केला आहे..कोणतीही गोष्ट ही आपल्या...

जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

स्वामी वाणी पुष्प ५३३(पर्व ४ थे भाग ३७) आजचे चिंतन-मनन सर्व शास्त्र हुनी थोर !! असे माझा स्वामीराव !! जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वाचताना असे वाटते कि आपण अर्थ समजला.. पण अर्थ इतका खोल आहे कि... आपणस लगेचच...

श्री स्वामी समर्थ म्हणजे असे ‘पुण्य’ ..ज्याने ‘नशीब’ बदलले आमुचे !!

स्वामी वाणी पुष्प ५३२(पर्व ४ थे भाग ३६) आजचे चिंतन-मनन श्री स्वामी समर्थ म्हणजे असे 'नशीब' ..जे भेटते 'पुण्याईने' !! श्री स्वामी समर्थ म्हणजे असे 'पुण्य' ..ज्याने 'नशीब' बदलले आमुचे !! www.SwamiVaani.com...

अहंकार नसावा मनी !

स्वामी वाणी पुष्प ५३०(पर्व ४ थे भाग ३४) आजचे चिंतन-मनन अहंकार नसावा मनी ! समर्पित कर्म करावे प्रत्येक क्षणी !! कर्ता करविता एकच समर्थ स्वामी ! ऐसा विवेक जागृत ठेवुनिया !! www.SwamiVaani.com वरील ओवीतून स्वामी आपणस काय सांगत आहेत .. अहंकार नसावा मनी.. म्हणजेच इथे...

काळजी नको करू मित्रा

स्वामी वाणी पुष्प ५२९(पर्व ४ थे भाग ३३) आजचे चिंतन-मनन काळजी नको करू मित्रा, स्वामी तुझ्या पाठीशी आहे..! ह्या स्वामी शक्तीवर ठेव विश्वास, आता नशीब तुझ्या सोबत आहे..!! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..या ओवीतून ही मनावर प्रहार केला आहे..आपण स्वतः स्वतःच्या मनाला...

स्वामी करणार नाही तुला उदास !!

स्वामी वाणी पुष्प ५२८(पर्व ४ थे भाग ३२) आजचे चिंतन-मनन अरे किती सोसतोस त्रास !! बन तू स्वामींचा दास ! विश्वासाने सांगतो , स्वामी करणार नाही तुला उदास !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..काय आहे आजच्या स्वामीं वाणी चा संदेश..पहिली ओवी तुन प्रहार केला आहे..त्रास...

आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.

स्वामी भक्तहो .. आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.. पण केले जात नाही कारण चिंतन मनन का करायचे.. याचा फायदा काय हेच आम्ही समजून घेत नाही .. चला आधी आपण चिंतन मनन म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू... आपण सर्व शिकलो.. आज प्रत्येक जण काही तरी काम करतो.. पण...

अशक्य ही शक्य करतील स्वामी

स्वामी वाणी पुष्प ५२६(पर्व ४ थे भाग ३०) आजचे चिंतन-मनन अशक्य ही शक्य करतील स्वामी जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा , नको घाबरू तू असे बाळ त्यांचा | www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर चिंतन मनन काय करणार..कारण तारक मंत्रातील प्रत्येक शब्द हा..तारणहार...

दत्त येऊनिया ऊभा ठाकला

स्वामी वाणी पुष्प ५२५(पर्व ४ थे भाग २९) दत्त येऊनिया ऊभा ठाकला , सदभावे साष्टांगेसी प्रणिपात केला | प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला , जन्ममरणाचा फेरा चुकवीला || - श्री दत्त महाराजांची आरती www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेलच.. लहानपणा...

जाणसी मनीचे सर्व समर्था

स्वामी वाणी पुष्प ५२४(पर्व ४ थे भाग २८) ✨ आजचे चिंतन-मनन ✨ जाणसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भवहरा रे ।। इतुके देई दीन दयाळा , नच तव पद अंतरा रे ।। - आरती संग्रह (दिंडोरी प्रणित सेवा मार्ग) www.SwamiVaani.com स्वामीं भक्त हो..वरील ओवी म्हणजे ह्रदयातून आलेले आर्त...