श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4

Nov 13, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

खरा होई जागा श्रद्धे सहित आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे…असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते… पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि… आपण स्वामींचे सेवेकरी आहोत… कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते संकटा  विषयी आणि आपल्या अंतर्मनातील श्रद्धे ची जागा भीती नि घेतली असते… त्यामुळे आपल्या मधील श्रद्धा भाव कमी होतो… हि श्रद्धा कमी होऊ नये या साठी आपणस स्वामी नामाची कास धरायची आहे… आणि आपल्या अंतर्मनात श्रद्धा भाव पोहोचवायचा आहे.

कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त

मनात नाही भाव आणि स्वामी मला पाव… असे कसे होईल… फक्त आपण स्वामी सेवेकरी आहोत असे म्हणून.. आपण स्वामींचे सेवेकरी होणार आहोत का ? नाही त्या साठी आपणस आपल्यातील श्रद्धा हा गुण  वाढवायचा आहे… आता हा गुण  कसा वाढेल… सोपे आहे… रोज एक तरी स्वामी लीला वाचावी… त्यावर स्वतः चिंतन … मनन करावे… रोज किमान ५ मिनिटे स्वामी नाम जप रुपी सेवा करावी.. पहा नककीच आपली श्रद्धा वाढेल… आणि आपल्या अंतर्मनातून आवाज येईल मी स्वामींचा बाळ आहे .. आता  भीतीचे काय कारण .

किती दा दिला बोल त्यानीच हाथ आज पर्यंत आपणस अनेकदा संकट..  दुःख आली… आपणस  त्यातुन कुणी वाचवले… स्वामींनी च वाचवले ना.. मग आज जेव्हा संकट आले आहे तेव्हा आपले मन का बरे विसरले आहे..आपले मन हे विसरल्यामुळे काय होते.. आपणस आपले दुःख मोठे वाटू लागते आणि सर्व मार्ग आपणस बंद दिसतात… या मुळे संकट आले कि सर्वप्रथम मनास सांगा… हे संकट नसून मला शिकण्याची संधी आहे… कारण यातून बाहेर तर मी सहजच पडणार आहे… कारण स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत.. आज पर्यंत त्यांनीच तर मला  हाथ दिला आहे… आणि स्वामींनी एकदा हाथ धरला कि ते सोडत नाहीत.

नको डग मगू स्वामी देतील साथ हे मना तू डगमगू नकोस… कारण आज पर्यंत प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांनी साथ दिली आहे… आपले मन डगमगले कि आपले होणारे काम होत नाही… आणि आपला एक नकारात्मक विचार…आपले यश आपल्या पासून दूर नेऊ शकते… त्यामुळे न डगमगता  संकटांना  सांगा… स्वामी महाराजांची साथ माझ्या सोबत आहे… डगमगू नकोस… भिऊ नकोस.


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...