श्री गजानन महाराज लीला दर्शन 2

Nov 11, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

 

श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे… ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत .
आपण पहिल्या लीलेत पाहिले कि ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कचरा कुंडी मध्ये फेकलेल्या उष्ट्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात होते… आता हे दृश्य येणारे जाणारे लोक पाहत होते… परंतु त्यांच्यापाशी जाऊन कोणी त्यांच्याशी बोलले नाही… त्याच वेळेस त्या तिथून श्री बंकटलाल व त्यांचे स्नेही श्री दामोदरपंत कुलकर्णी तिथून जात होते… श्री बंकटलाल अग्रवाल यांनी पहिले कि महाराज कचरा कुंडीत टाकलेल्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात आहेत… हे पाहून ते श्री दामोदरपंत कुलकर्णी यांना म्हणाले कि आपणस दिसताना हे सर्वसामान्य व्यक्ती वाटत आहेत परंतु नक्कीच हे सामान्य व्यक्ती नसावेत कारण जर हे सामान्य व्यक्ती असते तर त्यांनी अन्न मागून खाल्ले असते आणि श्री पातुरकर यांनी सुद्धा त्यांना जेवण दिले असते… हे नक्कीच कुणीतरी मोठे संत असावेत… त्यानंतर श्री बंकटलाल श्री महाराजान जवळ गेले… आणि विनयपूर्वक श्री महाराजांना विचारले कि ” महाराज आपण हे काय करत आहात ? आपणस भूख लागली आहे का ? मी आपल्या साठी भोजन घेऊन येऊ का ? श्री महारांजानी त्यांच्याकडे पहिले… त्यांची तेजः पुंजः मुद्रा पाहून श्री बंकटलाल यांना काय बोलावे हे सुचलेच नाही व ते लगेचच श्री पातुरकर यांच्या कडे गेले व त्यांच्या कडून भोजनाचे ताट घेऊन आले… त्यात विविध पदार्थ होते.. सर्वांनी श्री महाराजांना भोजन करण्याची विनंती केली… महाराजांनी ताटातील सर्व पदार्थ एकत्र केले व भोजन केले… हा सर्व प्रकार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले… आणि त्याच वेळी श्री श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे… ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत .
| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||
बोध -वरील लीलेच्या माध्यमातून आपणस अनेक बोध प्राप्त होत आहेत… ब्रम्हांड नायकाची प्रत्येक लीला आपणस शिकवण देण्यासाठीच असते… परंतु ती समजण्यासाठी श्री बंकटलाल अग्रवाल यांच्या सारखी भक्ती असावी लागते… पहा ना वरील लीलेत असंख्य लोक त्या रस्त्यावरून गेले… परंतु प्रत्येकाने हाच विचार केला कि कुणीतरी सामान्य व्यक्ती आहे… भूख लागली असेल त्या कारणाने… कचरा कुंडीत टाकलेल्या पत्रावळी वरील भाताचे शीत खात असतील… त्याच रस्त्याने श्री बंकटलाल अग्रवाल त्यांच्या स्नेह्या सोबत जात असताना त्यांनी पाहता क्षणी ओळखले कि हे कुणी सामान्य व्यक्ती नसावेत… पहा त्यांची चेतनेची अवस्था कि उच्च होती… तत्यांची लीला पाहूनच त्यांनी ओळखले कि हे कुणी सामान्य व्यक्ती असू शकत नाहीत… श्री महाराज यांनी सर्व पदार्थ एकत्र केले व त्या नंतर भोजन केले… थोडक्यात बंकटलाल यांच्या मनात जे प्रश्न निर्माण होत होते.. त्या प्रश्नाचे श्री महाराजांनी काही न बोलता उत्तर दिले… खरोखर श्री बंकटलाल यांची भक्ती ची अवस्था किती उच्च्तम असेल कि त्यांनी श्री महाराजांची लीला पाहूनच समजून गेले कि … हे कुणी सामान्य व्यक्ती असूच शकत नाहीत… आपणस श्री महाराज हा सुद्धा बोध देत आहेत कि.. अनेकदा काय होते कि आपणस अनेक पदार्थ आवडत नसतात त्यामुळे आपण ते खात नाहीत… परंतु श्री महाराज आपणस सांगत आहेत कि कोणत्याही पदार्थाचा स्वाद हा जीभेपर्यंत मर्यादित असतो… अन्न हे आपल्या शरीराची गरज आहे… त्याचे मुख्य काम आपल्या पोटाची तृष्णा शांत करणे … आणि आपणस शक्ती… स्फूर्ति देणे आहे… स्वाद घेणे हे उद्दिष्ट नाही…. त्या मुळे आपणस सर्व अन्न पदार्थांचे सेवन देवाचा प्रसाद म्हणून करायचे आहे …आणि हाच गोष्ट आपल्याला आपल्या मुलांना शिकवायची आहे … !

| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… श्री गजानन महाराज.. आम्ही आपली लीला समजण्यास असमर्थ आहोत… आमच्या चेतनेची पायरी( समज) फारच कमी आहे… परंतु तुमची कृपा असेल तर नक्कीच ती वाढेल … आम्ही आपणास प्रार्थना करतो कि जशी कृपा श्री बंकटलाल अग्रवाल यांच्यावर केलीत.. त्या पात्रतेचे आम्हाला बनव… ! धन्यवाद आई… धन्यवाद हि प्रार्थना करवून घेतल्या बद्दल धन्यवाद!


Share
और पढिये !!

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...

जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?

!!श्री स्वामी समर्थ!! ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे...

असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।

!!श्री स्वामी समर्थ!! असोनी संसारी जिह्वे वेगु करी । दशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ हरिपाठ www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो....संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली इथे आपणस नामाची महती सांगत आहेत..संसारात असताना नाम घ्या..पहा किती सोपे आहे..हाताने प्रापंचिक कर्म..मुखाने...

हरि मुखे म्हणा.. हरि मुखे म्हणा

!!श्री स्वामी समर्थ!! हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ हरिपाठ पहा नामाचा महिमा..रोज किमान १ माळ स्वामीं नाम जप करूया..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत..मुखाने नाम घ्या..त्या सारखे दुसरे पुण्य...

देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

श्री स्वामी समर्थ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरिपाठ ओवी चिंतन मनन स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची...

खरा कर्ता मी आहे का?

श्री स्वामी समर्थ हे मना मला वाटते की..मी करतो म्हणूनच कार्य होत आहे..पण मी नव्हतो तेव्हाही कार्य सुरू होते..मी नसतानाही कार्य सुरूच असणार आहे..मग मी कसा कर्ता.. कर्ता आणि करविता..तू एक स्वामींनाथा..माझ्यातील कर्ता भाव दूर कर..धन्यवाद समर्था..! www.chetnakeswar.com...

आपले विचार इतरांवर लादू नका!

!!श्री स्वामी समर्थ!! हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..! स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत...

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रोज ११ वेळेस म्हणा

!! श्री स्वामी समर्थ !! स्वामी भक्तहो कोणतीही आर्थिक समस्या नसून आपल्या विचारातील मानसिकता आहे.. आपल्या अंतर्मनातील विचार आहेत.. चला आपले विचार बदल्या.. खालील विचार रोज १ वेळेस किंवा ११ वेळेस म्हणा पहा काय बदल घडतात.. धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद !! हे मना मला...

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस.

स्वामी वाणी पुष्प ५९३(पर्व ४ थे भाग ९७) प्रेरणादायी बोल प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस..अरे विश्वास ठेवा !! प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात.. स्वामींची सम्पूर्ण शक्ती असते..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. स्वामी महाराज आजच्या...

यशाला कधीच शॉर्टकट नसतो.

स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५) प्रेरणादायी बोल हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच...