नवरात्र व आपली प्रगती

Oct 7, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

 

नवरात्र म्हणजे म्हणजे आपल्या प्रगतीचा कालावधी…आपण अनेक सण- वार साजरे करतो… करत आहोत… आणि करणार आहोत पण.. आपल्या पूर्वजानी जे अनेक सण  आपणस सांगितले आहेत या मागे फार विचारपूर्वक आपल्या प्रगती चा विचार करून हे सर्व केले आहे… आपण दरवर्षी नवरात्र साजरी करतो.. उपवास करतो…अनेक गोष्टी करतो पण आपल्या प्रगती साठी या कालावधी मध्ये काय करतो… आपण म्हणाल आम्ही जे काही करतो ते आमच्या प्रगती साठीच तर करतो…खरं  तर नवरात्र म्हणजे शक्ती च्या जागृती चा उत्सव… प्रत्येक आई ला वाटते आपले मुलं खूप मोठे व्हावे… पण मग त्यासाठी आपण सुद्धा कष्ट करणे आवश्यक आहे कि  नाही… खरं तर नवरात्र उत्सव म्हणजे आध्यत्मिक उन्नतीचे पर्व..पण मग आपली अध्यात्मिक प्रगती कशी होईल… केवळ उपवास करून… तीर्थ यात्रा करून होईल का … खरतर नवरात्र म्हणजे आपल्या घरीच राहून साधना करण्याचे पर्व..या कालावधी मध्ये जपानुष्ठान साठी सर्वोत्तम असतो… आपण या काळात आपल्या ज्या कोणत्या देवावर श्रद्धा असेल त्याची अशी जप संख्या करण्याचे अनुष्ठान करावे… जसे देवीचा कोणताही मंत्राचे आपण या ९ दिवसात… २१, ५१ किंवा १ लाख जपाचे अनुष्ठान करू शकता का…यातून आपली अध्यात्मिक प्रगती तर होईलच पण त्याच बरोबर आपले चित्त स्थिर होण्यास मदत  होईल..आणि हीच खरोखर देवी भगवतीची सेवा असेल… चला तर मग आपल्या कडे जे काही दिवस आहेत त्यात अधिकाधिक आपल्यावर काम करू या… चला तर मग सेवेस सुरुवात करूयात… पुढील भागात या विषयावर अजून सविस्तर चर्चा करूया… आपले चॅनेल सुब्स्क्रिब करा इतरांनाही सांगा… धन्यवाद.. कोटी कोटी धन्यवाद

प्रार्थना – हे देवी भगवती… हा नवरात्र उत्सव आमच्या जीवन बदुलन टाकणारे होऊ दे… आम्हाला आमच्या स्वतः वर काम करण्याची प्रेरणा तू उत्सवाला निमित्त करून आम्हाला दिलीस हि तुझी कृपाच आहे… हे आई तुला भूषणावह होईल अशी कर्म रुपी सेवा आमच्या कडून करून घे… धन्यवाद आई… धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद! www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...