श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 2

Sep 26, 2021 | ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

Share

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय – ज्या घरात स्वामी सेवा केली जाते तिथे कश्याची कमतरता नसते. या ठिकाणी घरात म्हणजेच आपले ह्रदय मंदिर. ज्या वेळेस आपण स्वामींची सेवा करतो त्या वेळेस हळू हळू आपले मनाला स्थिरता प्राप्त होते. मनाची शुद्धता झाली कि हृदयातून स्वामी नाम येऊ लागते म्हणजेच ह्रदयात स्वामी विषयी अनन्य भक्ती प्रेम जागृत होते आणि मग त्या आपल्या जीवनात कशाचीच कमतरता राहत नाही. आपले जीवन प्रेम आनंद आणि मौन याने भरून जाते.

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय – स्वामी महाराज स्वतः आपल्या भक्ताचे प्रारब्ध घडवतात. आपण अनेकदा या गोष्टीची अनुभूती घेतली आहे. अनेकदा आपण अडचणीत संकटात असतो. स्वामी महाराजांना प्रार्थना करतो… ती प्रार्थना करताना आपल्या मनात अनन्य भाव असतो आणि आपण पाहतो कि आपणस व असणारी गोष्टीची प्राप्ती आपणस होते म्हणजेच आपणस अनुभूती येते कि कश्या पद्धतीने स्वामी महाराज आपले प्रारब्ध घडवतात.

आज्ञेविणा काळ ना नेई त्याला – स्वामींच्या इच्छे शिवाय परलोक प्राप्ती सुद्धा होत नाही. याची अनुभूती आपणा पैकी बहुतेकांनी घेतला आहे. अनेक व्यक्ती अश्या परिस्थिती मध्ये असतात कि आपणस असे वाटतं असते कि कधी हि हि व्यक्ती परलोकी जाऊ शकते.. अश्या वेळेस आपण सर्व आपल्या भाव भटकी नुसार स्वामी महाराजांना प्रार्थना करतो आणि मृत्यू शय्ये वर असणारी व्यक्ती बरी होते.. म्हणजेच स्वामींच्या आज्ञे शिवाय आपणस परलोक सुद्धा होत नाही.

परलोकही ना भिती तयाला – आता आपणस जरी मृत्यू आला तरी आपण ज्या कोणत्या लोकी जाऊ तिथे सुद्धा आपणस स्वामी कृपेची अनुभूत प्राप्त होते. म्हणजेच आपणास जरी मृत्यू आला तरी आपणस मृत्यू भीती राहत नाही. पहा समजा आपणस कुणी सांगितलें कि तुम्ही उद्या मरणार आहात. अश्या वेळेस आपल्या मनात असंख्य विचार येतात. मला कसे मरण येणार.. मरण इतक्या लवकर नको… काही त्रास होईल का. असं अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. पण जेव्हा स्वामी सेवेत असतो अन स्वामी कृपेने आपणस आपल्या सत्य स्वरूपाची जाणीव हते तेव्हा सर्व प्रकारची भीती नाहीशी होते व आपले मन सांगते. स्वामीच्या इच्छे नुसार होणार आहे. मी कशाला चिंता , भीती बाळगू


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...