श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 2

Sep 26, 2021 | ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

Share

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय – ज्या घरात स्वामी सेवा केली जाते तिथे कश्याची कमतरता नसते. या ठिकाणी घरात म्हणजेच आपले ह्रदय मंदिर. ज्या वेळेस आपण स्वामींची सेवा करतो त्या वेळेस हळू हळू आपले मनाला स्थिरता प्राप्त होते. मनाची शुद्धता झाली कि हृदयातून स्वामी नाम येऊ लागते म्हणजेच ह्रदयात स्वामी विषयी अनन्य भक्ती प्रेम जागृत होते आणि मग त्या आपल्या जीवनात कशाचीच कमतरता राहत नाही. आपले जीवन प्रेम आनंद आणि मौन याने भरून जाते.

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय – स्वामी महाराज स्वतः आपल्या भक्ताचे प्रारब्ध घडवतात. आपण अनेकदा या गोष्टीची अनुभूती घेतली आहे. अनेकदा आपण अडचणीत संकटात असतो. स्वामी महाराजांना प्रार्थना करतो… ती प्रार्थना करताना आपल्या मनात अनन्य भाव असतो आणि आपण पाहतो कि आपणस व असणारी गोष्टीची प्राप्ती आपणस होते म्हणजेच आपणस अनुभूती येते कि कश्या पद्धतीने स्वामी महाराज आपले प्रारब्ध घडवतात.

आज्ञेविणा काळ ना नेई त्याला – स्वामींच्या इच्छे शिवाय परलोक प्राप्ती सुद्धा होत नाही. याची अनुभूती आपणा पैकी बहुतेकांनी घेतला आहे. अनेक व्यक्ती अश्या परिस्थिती मध्ये असतात कि आपणस असे वाटतं असते कि कधी हि हि व्यक्ती परलोकी जाऊ शकते.. अश्या वेळेस आपण सर्व आपल्या भाव भटकी नुसार स्वामी महाराजांना प्रार्थना करतो आणि मृत्यू शय्ये वर असणारी व्यक्ती बरी होते.. म्हणजेच स्वामींच्या आज्ञे शिवाय आपणस परलोक सुद्धा होत नाही.

परलोकही ना भिती तयाला – आता आपणस जरी मृत्यू आला तरी आपण ज्या कोणत्या लोकी जाऊ तिथे सुद्धा आपणस स्वामी कृपेची अनुभूत प्राप्त होते. म्हणजेच आपणास जरी मृत्यू आला तरी आपणस मृत्यू भीती राहत नाही. पहा समजा आपणस कुणी सांगितलें कि तुम्ही उद्या मरणार आहात. अश्या वेळेस आपल्या मनात असंख्य विचार येतात. मला कसे मरण येणार.. मरण इतक्या लवकर नको… काही त्रास होईल का. असं अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. पण जेव्हा स्वामी सेवेत असतो अन स्वामी कृपेने आपणस आपल्या सत्य स्वरूपाची जाणीव हते तेव्हा सर्व प्रकारची भीती नाहीशी होते व आपले मन सांगते. स्वामीच्या इच्छे नुसार होणार आहे. मी कशाला चिंता , भीती बाळगू


Share
और पढिये !!

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...