शिव पुराण कथा ३

शिव पुराण कथा 3

आपण शिव पुराण च्या दुसऱ्या कथेत पाहिले की चंचुला हिला।शिव लोक प्राप्ती झाली..म्हणजेच ती मुक्त झाली..मुक्त झाल्यानंतर सुद्धा तिची शिव भक्ती सुरूच होती..ती शिव पार्वती यांच्या समोर विनम्र भावनेने उभी राहिली..तिच्या डोळ्यात आनंद अश्रू येत होते…पार्वती माता ने तर तिला आपल्या सखी चे स्थान दिले…एके दिवशी ती पार्वती माते जवळ जाते आणि विनम्र भावनेने प्रार्थना करू लागली..तिच्या प्रार्थनेतील भाव इतका खोल होता की पार्वती माता..तिला म्हणाल्या की अग सखे तुला काय हवे आहे..जे हवे ते माग… तेव्हा ती म्हणाली की माझी तर मुक्ती झाली पण माझे पती कुठे आहेत..त्यांच्या कडून अनेक चुका झाल्या आहेत…तेव्हा पार्वती माता सांगतात..तुझा पती..विंध्य पर्वतावर..पिशाच्च योनीत दुःख भोगत आहे…चंचुला हिला फार वाईट वाटले आणि तिने आपल्या पतीच्या उद्धार होण्यासाठी काय मार्ग आहे तो सांगण्याची विनंती केली…पार्वती माता सांगतात की जर त्याने शिव पुराण कथा श्रवण केली तर तो मुक्त होईल..चंचुला विचारते हे कसे शक्य आहे…हे तर आपणच करू शकता..तेव्हा पार्वती माता..शिव कीर्ती गाणारे जे गंधर्वराज तुंबूर होते त्यांना बोलावले…व सांगितले की तुम्ही या चंचुला बरोबर…विंध्य पर्वतावर जा…आणि तिथे एक पिशाच्च आहे त्याला प्रयत्न पूर्वक  शिव पुराण ची कथा ऐकवा…जेणेकरून त्याचे ह्रदय शुद्ध होईल…आणि तो पिशाच्च योनीतुन मुक्त होईल…गंधर्व तुंबूर पार्वती मातेची आज्ञा घेऊन..चंचुला बरोबर विंध्य पर्वतावर जातात..तिथे त्या पिशाच्च दिसतो.. त्याच्या समोर शिव पुराण कथा सुरू करतात…शिव कथा ऐकून त्याचे चित्त शुद्ध झाले आणि तो पिशाच्च योनीतुन मुक्त झाला..दोघे पती पत्नी शिव भक्तीत तल्लीन झाले. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !

बोध – पहा उपरोक्त लीलेत माता पार्वती यांनी चंचुला यांना सखी चे स्थान दिले.. पहा आपले आणि ईश्वराचे नाते हि मित्रत्वाचे झाले पाहिजे.. पहा त्यासाठी आपल्याला आपल्यातील दोष दूर करणे आवश्यक आहे.. पहा चंचुला हिने काय फक्त श्री शिव महा पुराण कथा श्रवण केली का ? नाही तिने आपल्यात जे काही दोष आहेत ते आधी घालवले त्यावर कार्य केले.. आपणास हि तसेच करायचे आहे.. आपले दोष आपल्याला दिसत नाही ते दिसले पाहिजे.. जेणेकरून आपण ईश्वराच्या जवळ जाऊ आणि आपले आणि त्याचे नाते  मित्रत्वाचे होईल.. आता प्रत्येक मनुष्य हा कुटुंब वत्सल असतो.. ज्या प्रमाणे चंचुला हिने आपल्या पतीचा उद्धार व्हावा या साठी प्रयत्न केले.. इथे आपणस आपल्या कुटूंबासाठी करायचे आहेत.. आता ते कसे पहा सर्वप्रथम आपल्या स्वतःवर कार्य करा आता आपली अडचण काय मी जसे वागतो तसे घरच्यांनी वागावे.. पण हे शक्य नसते कारण आपणच तसे करत नाही..मग याला उपाय काय तर आपण घरात सकारात्मक वातावरण तयार करा.. कोणतीही गोष्ट असो.. ती सकारात्मक पणे हाताळा    पहा नक्कीच आपल्या घरच्यांवर हि त्याचा परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही.. कारण शिव महा पुराण कथा असो वा कोणताही ग्रंथ हा आपल्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे.. पण आपण त्यावर कार्य करत नाही.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !

चला आपण सर्व श्री महादेवाला प्रार्थना करूया.. हे महादेवा ज्या प्रमाणे श्री पार्वती माता यांनी  चंचुला हिला सखी चे स्थान दिले.. त्याच प्रमाणे आम्हाला त्या पात्रतेचे बनव.. आम्हाला आमच्या स्वतःवर कार्य करण्याची प्रेरणा दे.. परिस्थिती कोणतीही असुदे आमच्या कडून सकारात्मक प्रतिसाद येऊ दे.. धन्यवाद महादेवा.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !

शिव पुराण कथा २

 

समुद्राच्या जवळ एक बाष्कळ नावाचे गाव होते…तिथे धर्माचे आचरण सोडून वागणारे दोघेजण राहत होते….ते खूपच वाईट होते…त्यांचे मन दूषित होते…कायम विषयासक्त होते..ईश्वरावर त्यांचा विश्वास नव्हता..तिथे राहणारे लोक सुद्धा तसेच होते…त्या गावात एक बिंदुग नावाचा व्यक्ती राहत होता…तो फारच कुमार्गी होता…त्याची पत्नीचे नाव चंचुला होते…ती धार्मिक वृत्ती ची होती…पण पती मात्र दुराचारी होता..तरीही तीने तो त्रास सहन केला..त्यामुळे तिला अनेक यातना सहन कराव्या लागल्या..इतका की ती आपल्या पतीसोबत ती सुद्धा अधार्मिक बनली…अशीच अनेक वर्ष झाले..काही काळा नंतर बिंदुग मरण पावला…अनेक यातना झाल्या..त्याला पिशाच्च योनी मिळाली…पती च्या मृत्यू नंतर त्याची पत्नी आपल्या मुलांच्या सोबत रहात होती…एक दिवस काही कारणास्तव गोकर्ण इथे गेली…फिरता फिरता ती एका शिव मंदिरात गेली…तिथे..शिव कथा सुरू होती…ती कथा ऐकत असताना त्यात आपल्या कर्माचे फळ कसे मिळते याची समज तिला मिळाली… हे सर्व ऐकून तिच्या मनात भीती निर्माण झाली…कथा पूर्ण झाल्यानंतर ती जे कथाकार होते त्यांच्या कडे जाते…आणि आज पर्यंत ज्या काही चुका झाल्या त्या कथाकार आहेत त्यांना सांगते..तिचा तो भाव पाहून तिला समजावून सांगतात की  शिव कथा श्रवण करून तुला तुझी चूक लक्षात आली ही खूप मोठी  शिव कृपा आहे…हा निर्भय पण आहे..कारण सत्य स्वीकारणे खूप मोठी गोष्ट आहे…कारण चित्त शुद्ध असल्या शिवाय शिव पार्वती यांचा वास आपल्या ह्रदयात होऊ शकत नाही…कारण चित्त शुद्धी झाली की आपल्या ह्रदयात भगवान शिव जी यांच्या भक्ति चे दोन पुत्र म्हणजे.. ज्ञान आणि वैराग्य प्रगट होते…यात काही संशय नाही..यासाठी तू शिव भक्ती कर..शिव चरित्र वाच.. त्यावर चिंतन मनन कर नक्कीच..तुझी चित्त शुद्ध होईल आणि शिव कृपेस पात्र होशील…हे सर्व ऐकून चंचुला तिथेच राहते..शिव कथा श्रवण करते…तिला स्वानुभव प्राप्त झाला आणि ती विनाकष्ट शिवलोक प्राप्त झाले  .. बोला उमा महेश्वर देवता कि जय

बोध – शिव पुराण ची हि कथा आपणस मनावर कार्य करण्याची प्रेरणा देत आहे.. बिंदुग बरोबर राहून त्याची धार्मिक पत्नी चंचूला सुद्धा अधार्मिक झाली म्हणजेच या ठिकाणी आपणस बोध होतो कि.. आपली संगत कशी असावी.. कारण आपण ज्या संगतीत राहतो त्या नुसार आपले आचार विचार आणि विहार होतो.. त्या मुले आपणस सत्संगाची कास धरायची आहे.. इथे जी चंचुला ती आपल्या सर्वांमध्ये आहे.. पहा आपले मन कायम चंचल असते.. आता  इथे तर थोड्या वेळात दुसरी कडे जाते अश्या चंचल मनावर आपणस कार्य करायचे आहे.. म्हणजे चंचल मन अचल करायचे आहे..शिव पुराण कथा श्रवण केल्या नंतर चंचुला हिला आपल्या सर्व चुका लक्षात आल्या.. पहा अनेकदा असेच ईश्वर आपणस आपल्या चुका दाखवत असतो पण आपले चंचल मन त्या चुका दुर्लक्षित करतो आणि आहे ते चुकीचे वर्तन सुरु ठेवतो.. जो पर्यंत आपणस आपल्या चुका दिसत नाहीत आणि चुकीच्या वर्तनाच्या परिणामांची जाणीव आपणस होत नाही तो पर्यंत.. आपली चित्त शुद्धी होऊ शकत नाही.. पहा चंचुला हिला आपल्या चुका लक्षात आल्या.. मग तिने फक्त शिव पुराण ऐकले का ? नाही तिने शिव पुराणात सांगितल्या प्रमाणे आपल्या चित्तातील चुकीचे आचार विचार दूर केले.. हे करणे इतके सोपे नाही त्यासाठी आपल्यात निर्भयता हा गुण विकसित झाला पाहिजे तरच हे शक्य आहे.. आपणस शिव कृपेचा अनुभव हा तेव्हाच येईल जेव्हा आपले चित्त शुद्ध होईल.. यासाठी आपणस आजची लीला आपले चित्त शुद्ध करण्याची प्रेरणा देत आहे.. धन्यवाद समर्था.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..!

प्रार्थना – हे महादेवा – ज्या प्रमाणे चंचूला हिला शिव पुराण कथेस  निमित्त करून तिचे चित्त शुद्ध केलेस तसेच आमचे चित्त सुद्धा शुद्ध कर.. आमच्या ह्रदयात ज्ञान आणि वैराग्य प्रगट कर.. तुझ्या कृपेशिवाय हे शकय नाही.. धन्यवाद उमा महेश्वर देवता कि जय..

www.chetanakeswar.com

 

शिव पुराण कथा १

शिव पुराण हे भगवान शिव यांचे सर्वस्व आहे.. शिव पुराण  श्रवण किंवा पठण केले तर चारी पुरुषार्थ प्राप्त होतो.. चित्त शुद्धी साठी शिव महापुराण चे चिंतन मनन करावे.. देवराज नावाचा एक गृहस्थ होता .. तो सर्व आचरण हे चुकीचे होते.. ज्ञान नव्हते पण दाखवत होता खूप ज्ञानी आहे.. त्याने अनेकांचे धन लुबाडले होते.. एक दिवस तो फिरता फिरता उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज जिल्यात याचे पूर्वीच नाव प्रतिष्ठानपुर होते..  झूँसी गावात पाहोचला तिथे त्याला शिव मंदिर दिसले.. तिथे अनेक साधू संत .. शिव भक्त होते.. तिथे देवराज ला ताप आला होता.. तिथे शिव पुराण  ची कथा सुरु होती..देवराज तिथे शिव कथा श्रवण  करतो.. साधारण एक महिन्यात त्याचे निधन झाले.. तो यमलोकी जात असताना तिथे शिव गण येतात आणि त्याला कैलास वर घेऊन जातात.. त्यावेळेस धर्मराज सुद्धा हस्तक्षेप करत नाही.. असा हा शिव पुराण  चा महिमा आहे.. हि कथा शिव पुराणात येते.. बोला उमा महेश्वर देवता कि जय.. !

बोध – खरंतर ईश्वराचे प्रत्येक चरित्र हे आपणस चित्त शुद्धी साठी महत्वाचे कारक असे असते पण आपण फक्त ते वाचतो ऐकतो आणि इतरांना सांगतो.. पण त्यातून आपणास काय बोध होतो हे महत्वाचे.. उपरोक्त लीलेत आपले आचरण हे शुद्ध असावे हा बोध होतो.. कारण आपले आचरण आपले जीवन दर्शवते.. त्या व्यक्ती कडे ज्ञान नव्हते  पण असे दाखवत होता कि मी खूप ज्ञानी आहे.. कधी कधी आपणही हि चूक करतो आपणस अनेकदा एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसते आपण ते मान्य करत नाही उलट खोटे ज्ञान प्रदर्शित करतो.. हि चूक आपणस दूर करायची  आहे.. त्याने अनेकांचे धन लुबाडले म्हणजेच इथे आपणस प्रामाणिकपणे धन कमवायचे आहे.. थोडक्यात शिव पुराण कथा आपणस शुद्ध आचरण ठेवण्याची शिकवण देत आहे .. बोला उमा महेश्वर देवता कि जय

प्रार्थना – हे महादेवा.. देवराज यांना तू शिव पुराण कथेस निमित्त करून चित्त शुद्ध केलेस तसेच आमचेही चित्त शुद्ध कर.. आमचे चुकीचे आचरण दूर कर.. आम्हाला ज्ञानी बनव पण खोटे ज्ञान प्रदर्शित न करण्याची बुद्धी दे.. प्रामाणिक पणे धन कमवण्याची बुद्धी दे.. धन्यवाद समर्था .. हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद..!  

www.chetanakeswar.com

प्रार्थना कोणती पूर्ण होते

प्रार्थना – आपण लहान पणा पासून ऐकतो प्रार्थना करत आलो आहोत.. आपण हि आपल्या मुलांना हि प्रार्थना करण्यास सांगतो.. पण प्रार्थना म्हणजे असते तरी काय.. हृदयातून निघालेला आवाज जो सर्वांचा हित दायक असतो त्यास आपण प्रार्थना म्हणू शकतो आता याची अशी एकच व्याख्या करणे अवघड आहे.. कारण प्रत्येकाच्या या बाबत वेगवेगळे मत आहेत.. पण आपण जर अनेक प्रार्थना पाहिले तर आपणस जाणवते कि.. प्रार्थना हि नेहमी विश्व कल्याण करणारी असते हे आपणस जाणवते..आपण अनेकदा व्यक्तिगत प्रार्थना करतो.. त्या पूर्ण होण्यास वेळ लागतो.. पण जेव्हा आपण सर्व समावेशक म्हणजेच अव्यक्तिगत प्रार्थना करतो तेव्हा ती लवकर पूर्ण होते.. जसे पसायदान आपण जर या वर चिंतन मनन केले तर आपणस जाणवेल माऊलींनी विश्वाचे कल्याण व्हावे या साठीच प्रार्थना केली आहे.. आपण प्रार्थना करताना ती कोणत्या भाषेत वा शब्दांत करतो या पेक्षा आपले भाव महत्वाचे आहेत..आपण रोज प्रार्थना करताना प्रयत्न करा कि सर्वांसाठी प्रार्थना करूया.. पहा आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल कि सर्वांसाठी का ? पहा आपल्या सर्वांचे सुख हे एकमेकांवर अवलंबून आहे.. पहा समजा माझा कपडे विकण्याचा व्यवसाय आहे.. मी म्हंटल कि माझा चालू दे.. तर हि प्रार्थना अपूर्ण आहे.. कारण माझा व्यवसाय हा ग्राहकावर अवलंबून आहे.. ग्राहक तेव्हाच येईल जेव्हा त्या कडे पैसे असतील.. त्या कडे तेव्हाच पैसे येतील जेव्हा तो जिथे नोकरी करत असेल तो व्यवसाय व्यवस्थित चालत असेल.. म्हणजेच प्रत्येकाचे सुख हे एकमेकांवर अवलंबून आहे.. जर इतर सुखी होतील तरच आपण हि सुखी होऊ शकतो.. म्हणून मला प्रार्थना करताना अशी करावी लागेल कि.. सर्वांचा व्यवसाय , नोकरी मध्ये यश प्राप्त होऊ दे.. म्हणजेच प्रार्थना व्यक्तिगत न राहता.. विश्वकल्याणाची होईल.. आपणस जी काही प्रार्थना सुचते ती नेहमी लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा.. पहा आपल्याच प्रार्थना भविष्यात आपणस प्रेरणा देतील.. चला तर मग आजपासून आपल्या प्रार्थना बदलूया.. आपले जीवन बदलूया.. धन्यवाद स्वामी..!
या बाबत आपले अभिप्राय आपण आम्हाला – chetnakeswar.com@gmail.com यावर पाठवू शकता

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २८ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

अरे या अध्यात्म विद्येला पोट भरण्याची विद्या बनवू नका

खंडू पाटीलांनी श्री महाराजांना विनंती करून आपल्या घरी राहण्यास नेले..एकेदिवशी खंडू पाटील यांच्या घरी काही कर्मठ ब्राह्मण आले.. त्यांना पैशाचा लोभ होता.. त्यावेळी श्री महाराज आराम करत होते.. हे कर्मठ ब्राम्हण मोठं मोठ्याने मंत्र म्हणू लागले जेणे करून श्री महाराज उठतील.. मंत्र म्हणत असताना ते अनेक चुका करत होते.. गजानन महाराज उठले आणि त्यांना म्हणाले अहो.. अरे या अध्यात्म विद्येला पोट भरण्याची विद्या बनवू नका.. अरे उगाचच भोळ्या भक्तांचा फायदा घेऊ नका.. महाराजांनी शुद्ध स्वरात मंत्र म्हणून दाखवले.. महाराजांचे मंत्र ऐकून त्या सर्वांना आश्चर्य वाटले.. त्यांना समजले कि महाराज हे कुणी साधारण व्यक्ती नसून.. विधातच आहेत.. हे सर्व जण महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.. महाराजांनी हि त्यांना आशीर्वाद दिला..महाराजानी खडूं पाटलांना त्या ब्राह्मणांना १-१ रुपये दक्षिणा देण्यास सांगितली.. त्यानंतर ते ब्राम्हण तिथून दुसऱ्या गावी निघून गेले.. बोला श्री गजानन महाराज कि जय .
बोध – अध्यात्म हे पोट भरण्याचे साधन नसून.. ती ईश्र्वराच्या जवळ जाण्याचा.. त्याची अभिव्यक्ती करण्याचे माध्यम आहे