जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३)

आजचे चिंतन-मनन

जावे स्वामींना शरण !
करावे स्वामी आज्ञेचे पालन !!
ह्यातच आहे आपुले कल्याण !
संशय न धरावा मनी !!

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ शकते..स्वामीं ना शरण जायचे..याचा अर्थ आपले प्रत्येक कर्म हे आपणस स्वामीं सेवा म्हणून करायचे आहे..म्हणजे आपले कर्म करताना आपणस १००% द्यायचे आहेत… स्वामीं आज्ञेच पालन करायचे आहे..म्हणजेच..आपणस जे कोणते काम मिळाले आहे..ती स्वामीं आज्ञा समजून करायचे आहे..ह्यातच आपले कल्याण आहे..पण हे सर्व करत असताना आपल्या मनात कोणताही संशय असता कामा नये..हीच स्वामीं सेवा आहे..म्हणजेच आपले नित्य कर्म प्रामाणिकपणे करणे ही स्वामीं सेवेची प्राथमिक अट म्हंटलं तरी चालेल..चला तर मग आजपासून आपण जे ही कर्म करतो ते प्रामाणिक पणे करूया..स्वामीं सेवा स्वामीं चरणी रुजू करू या..धन्यवाद स्वामीं

 

तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१)

आजचे चिंतन-मनन

तुज चरणापासून नको दूर लोटू !
तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!
दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !!
दास राहीन सदैव !!

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो…भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द…खरच समर्था खूप खूप धन्यवाद असे भाव, विचार वाणी आमच्या पर्यंत पोहचवतोस त्याबद्दल.. हीच तर तुझी कृपा आहे..समर्था काहीही होऊ दे पण आम्हाला तुझ्या चरणापासून दूर करू नकोस..इथे आपली गल्लत होऊ शकते स्वामीं चरण फक्त स्वामीं च्या मंदिरात आहेत का ? नाही तर सर्वत्र स्वामीं चरण आहेत..प्रत्येकाच्या हृदयात स्वामीं चा वास आहे..पण आपणस याचा विसर पडला आहे.. आपण इतरत्र स्वामीं ना शोधतो…आता ती वेळ आली आहे..स्वामींना प्रार्थना करूया समर्था तुझे जे स्थान ..चरण..हृदयात आहेत..त्या पासून मला दूर करू नकोस…आता आपणस स्वामीं च्या चरणांशी स्थान मिळाले..पण ते टिकवता आले पाहिजे..त्याला पर्याय काय.. स्वामीं नाम “”श्री स्वामीं समर्थ”” नामाचा जप..पण आपण सोपे साधन सोडून नको त्या मार्गाने स्वामींना शोधतो..म्हणून आज पुन्हा सर्वांना विनंती आहे..स्वामीं नाम घ्या..थोडे घ्या पण..माझे स्वामीं आईचे नाम घ्या..स्वामीं नामाची सवय कशी लागू शकते..दृढ संकल्पाने..जसे मी सामूहिक ११ कोटी स्वामीं नाम जप सेवेत एक वर्षात किमान ६,६६,६६६ स्वामीं नाम सेवा रुजू करेल..कुणी म्हणेल मी २१,००० सेवा रुजू करेल..हा झाला दृढ संकल्प… सामूहिक स्वामी नाम सेवा हे निमित्त आहे स्वामीं सेवेचे..पहा आजरी पडल्यावर आपण औषध घेतो.. पण आजारी पडू नये याचीच काळजी आपण घेतली तर..आपले मन आजारी पडते..मग आम्ही हताश होतो.. इकडे तिकडे भरकटत बसतो .जर आपण आजपासून मनाला स्वामीं नाम सेवेचे काम दिले तर..नक्कीच ते भरकटणार नाही..ते इतरांना देखील प्रेरणा देईल..इथे म्हंटले आहे..दास राहीन..इथे थोडक्यात आपणस आपल्या मनाचे दास न बनता.. आपल्या मनाला स्वामी चरणाचे.. स्वामीं नामाचे दास बनवायचे आहे..म्हणजेच आपल्या हृदयातील स्वामीं चरणी आपणस एकरूप व्हायचे आहे..यावर आपण स्वतः चिंतन मनन करा..खूप छान मार्गदर्शन स्वामीं करतील..स्वामीं नाम घ्या..धन्यवाद स्वामीं ही समज दिल्याबद्दल.. हे चिंतन करून घेतल्याबद्दल…!

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

आजचे चिंतन-मनन

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !
शरण आलो तुला !!
‘मी’ पणाच्या जाळ्यात,मन हे फसले !
मुक्त कर तू मला !!

स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत आपला मी पणा वर येतो.. मी अमुक करतो म्हणून हे घडते.. मी सेवा करतो… खरंच आपण करतो म्हणूनच सुख मिळते का? म्हणजे आपणच सुख कारक आहोत का? चला आता यावर विचार करू मग दुःख आल्यावर का बरं आपण म्हणतो कि मी फार कष्ट केले पण मला यश आले नाही..नशिबात नव्हते.. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते कि आपणस दैववादी वा अंधश्रद्धा वादी नाही बनायचे पण आपणस कर्म करून विसरून जायचे आहे.. म्हणजेच कोणत्याही गोष्टीत आपल्यात मी पणा आपणस आणायचा नाहीये.. म्हणजेच आपणस कर्ते पणा स्वामींना अर्पण करायचा आहे.. पण आपल्यातील हा मी पणा कसा दूर होईल तर.. हा मी पण दूर करण्यासाठी आपणस आपल्या विचारांचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे.. विचारांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न नाही करायचा पण त्या विचारांना योग्य ती दिशा देणे महत्वाचे आहे.. हे सर्व तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण आपल्या विचारांना स्वामी नामावर स्थिर करायचे आहे..स्वामी नाम सेवेत सातत्य आणायचे आहे.. या सर्व गोष्टीसाठी आपणस स्वामींना आपल्या शब्दात प्रार्थना करणे आवश्यक आहे.. कारण प्रार्थना जेव्हा ह्रद्यातून येते तेव्हा त्यात आवश्यक भक्ती भाव उतरतो.. चला तर मग स्वामींनाच प्रार्थना करूया– हे समर्था तूच सुखकारक आहेस.. तूच दुःख विनाशक आहेस.. पण माझे मन नेहमी मी पणा मागते.. कृपा कर माझ्यातील मी पणाचा भाव दूर कर.. माझ्यातील मी पणा जोपर्यंत तुझी कृपा होत नाही तोपर्यंत तो दूर होऊ शकत नाही..मला मी पणा च्या जाळ्यातून मुक्त कर.. कारण हे तुझ्या कृपेशिवाय शकय नाही.. धन्यवाद समर्था.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. !!

वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९)

आजचे चिंतन-मनन

वटवृक्षातळी अक्कलकोटी ,
आजही समर्थ निवास करती !!
प्रेमभावे दर्शना जाती ,
प्रत्यक्ष दिसती स्वामी !!

www.SwamiVaani.com

स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे आपण दर्शन घेता. आजही तिथे आपणस.. टाळ मृदूंगाचा नाद आपण ऐकू येतो.. स्वामींचा निवास तिथे आहे.. आजही अनेकांना स्वामींचे दर्शन होते.. इथे आपणस स्वामी विषयी प्रेम भाव जागृत असणे आवश्यक आहे..आता स्वामी विषयी प्रेम भाव आपल्यात कसा जागृत होईल.. जेव्हा आपण नित्य सेवा करू.. नित्य स्वामी नाम घेऊ.. जेव्हा आपणास स्वामी नामावर प्रेम जागृत होईल तेव्हा.. स्वामींवर प्रेम भाव जागृत होईल.. जेव्हा भक्ती मध्ये प्रेम निर्माण होईल.. तेव्हा स्वामी सेवेचा आनंद प्राप्त होईल.. स्वामी सेवेत प्रेम.. आनंद आला कि स्वामी अनुभूती येणारच.. चला तर मग स्वामी सेवेत प्रेम भक्ती आनंद निर्माण करूया.. !

आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !!

स्वामी वाणी पुष्प ५३४(पर्व ४ थे भाग ३८)

आजचे चिंतन-मनन

हे मना !
आता नको भीती कुणाची !
प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !!
क्षणोक्षणी काळजी घेती भक्ताची !
ही गुरूमाऊली !!

www.SwamiVaani.com

या ओवीतून स्वामीं नी आपल्या मनावर प्रहार केला आहे..कोणतीही गोष्ट ही आपल्या अंतर्मनात असते..जिचे रूपांतरण आपल्या जीवनात होत असते..जसे आपल्या मनात भीती किंवा वैचारिक काहूर असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो..मग अनके शारीरिक त्रास सुरू होतात..या साठी स्वामीं आपणस मनावर कार्य करण्यास सांगत आहेत..मनावर कार्य करण्याचा सोपा मंत्र..तारक मंत्र म्हणा..पहा आपल्यात विचारात, मनात किती बदल होतो..आपल्या पाठीशी स्वामीं ची शक्ती आहे पण आपण हे विसरलो आहोत.. यांचा विसर पडला की भीती , भय निर्माण होणारच.. ही भीती आपणस दूर करायची आहे..आपण जर सूक्ष्म विचार केला तर आपणस जाणवेल स्वामीं आपली कशी काळजी घेतात.. या साठी आपणस भक्ती भाव वाढवणे आवश्यक आहे..भक्ती भाव कसा वाढेल..रोज नाम जप सेवा..तारक मंत्र म्हणणे हाच तर उपाय आहे..चला तर मग स्वामीं नाम घेऊया…!