हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)*

*प्रेरणादायी बोल*

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ लावू शकतो..त्यामुळे यावर खूप खोल चिंतन मनन आवश्यक आहे..स्वामीं आपणच चिंतन मनन करून घ्या..सर्वप्रथम आपण सर्वांनी स्वतःला प्रश्न विचारणे आवश्यक आहे की माझ्या जीवनाचे ध्येय काय आहे? कदाचित यांवर विचार केला नसेल तर आता यावर विचार करा..ध्येय हे कोणतेही असू शकते.. माझं ध्येय असेल खूप पैसे कमविणे.. यात वाईट काही आहे का ? नाही ..पण खूप पैसे कशा साठी हे सुद्धा स्पष्ट असावे..त्या साठी काय करणार हे निश्चित असावे…या साठी आपले मार्गदर्शक कोण आहेत..कुणाच्या पावलावर पाऊल आपण टाकणार आहोंत..हे खूप महत्त्वाचे.. आपला आदर्श श्रीमंत व्यक्ती असणार हे निश्चित..पण व्यक्ती श्रीमंत कशी झाली ? कष्ट करून की अनीती ने..त्या व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश केवळ पैसे कमविणे आहे की मिळालेल्या पैशाचा वापर..सर्वांच्या हितासाठी करतो..हे महत्वाचे..कदाचित आपल्या मनात येईल की मी पैसे कमवून समाज हित का करू ? समाज हित म्हणजे केवळ दानधर्म नसून.. आपल्या कर्मातील नीतिमत्ता ही सुद्धा समाज सेवाच आहे..म्हणजेच आपला आदर्श हा असाच असावा जो समाजहित कारी असेल..नाही तर आपले धेय्य कदाचित तातपुरते साध्य होईल पण ते अखंड यश नक्कीच नसेल..त्यात यशाचा सुवास नसेल..स्वामीं ना भूषणावह नसेल.. थोडक्यात अश्याच व्यक्तीच्या पाऊलावर पाऊल टाकूया ज्यांच्या यशाच्या प्रवासाची दिशा ही सर्वसमावेशक असेल.. जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपले प्रत्येक कर्म हे स्वामीं सेवा बनते..स्वामीं ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती होते..धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!

लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)*

*प्रेरणादायी बोल*

एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ कर्म कर..उगाचच हा विचार करू नकोस की लोक काय म्हणतील..आपल्या सर्वांच्या मनात हा विचार घर करून बसलेला असतो की..मी हे कर्म केले तर लोक काय म्हणतील..अहो लोक काय म्हणतील या पेक्षा तुला काय वाटते..आपल्या स्वामीं ना काय वाटते हे महत्वाचे… अनेकदा एखादा कार्यक्रम असतो..लोक नाचत असतात..आपल्या मनात असते मी ही नाचावे..पण मनात विचार येतो..मी नाचलो तर लोक काय म्हणतील…अरे तुला आनंद मिळत आहे ना..तुझ्या आनंदाने कुणाचे नुकसान तर होणार नाही..स्वामीं ना तर कर्म आवडणारे असेल तर मग का विचार करतोस लोक काय म्हणतील.. लोक काय विचार करतील या विचाराने अनेक लोक आपले मन सुद्धा मोकळे करत नाहीत.. त्याचा परिणाम नको तिथे राग निघणे, कामात चुकी होणे असा होतो…अनेकदा आपण आपल्या मुलांनाही सांगतो.. अरे असे करू नकोस लोक काय म्हणतील? अहो या पेक्षा मुलांना सांगा तुला काय करावे वाटते हे मनसोक्तपणे बोल..त्याला बोलू द्या…त्यावर आधी चिंतन मनंन करा..जर अयोग्य असेल तर का अयोग्य आहे ते सांगा..पण कारण वास्तविक असावे..जर आपल्या मुलांचे म्हणणे बरोबर असेल.. तर लोक काय म्हणतील या पेक्षा ..ही गोष्ट याला करू न दिल्यामुळे त्याचे किती नुकसान होईल हा विचार करा..फक्त एकच गोष्ट करा..स्वामीं ना भूषणावह कर्म करा..पहा कसे आनंदी जीवन होतें..धन्यवाद स्वामीं… कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!

खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)*

*प्रेरणादायी बोल*

जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. जर फळे हवी असतील तर पेरले पाहिजे.. पेरणी करण्यापूर्वी जामिनीची मशागत केली पाहिजे..नको असणारा कचरा काढावा लागेल…वेळोवेळी आवश्यक प्रमाणात पाणी द्यावे लागेल..आवश्यकते नुसार खते द्यावी लागतील.. योग्य वेळी पीक काढावे लागेल..हेच स्वामीं आजच्या स्वामीं वाणीतून स्वामीं सांगत आहेत..आपल्या सर्वांना यश रुपी फळ हवे आहे..स्वामीं विचारत आहेत..सर्वप्रथम कष्ट कर…आधी आपल्या मनात जे विचार आहेत त्यांची मशागत कर..नको असलेल्या विचारांचा कचरा दूर कर..तो दूर कसा होईल तर चांगले वाचन, श्रवण केल्याने…नंतर बीज टाका..बीज कशाचे तुम्हाला काय करायचे आहे हे मनात निश्चित करा..त्याचा लिखित आराखडा बनवा..जसे मला पुढील एक वर्षात नवीन भाषा शिकायची आहे..मग त्या साठी आवश्यक ती माहिती तयार करा..कसे कसे नियोजन आवश्यक आहे..हे लिहून काढा..आता पेरणी सुरू करा..रोज संध्याकाळी चिंतन मनन करा..मी किती कष्ट घेतले..पाणी किंवा खते म्हणजे आपणस कोण कोण यात मार्गदर्शन करू शकतो ते शोधा..त्यांच्या कडून जे जे चांगले आहे..त्याचा वापर पाणी व कीटक नाशक म्हणून करा..म्हणजे आपले ज्ञान वाढेल..अज्ञान दूर होईल..वेळोवेळी आपण जे काही प्रयत्न करत आहोत त्याचे आत्म परीक्षण करा…कुठे कुठे कमतरता वाटते ती दूर करा..मनात विचार येईल थकलो।आता नको..खरंतर जेव्हा मन नको म्हणते..तो क्षण फार महत्वाचा कारण तेव्हा जर आपण थांबलो तर आपण यशापासून दूर जातो..मन नको म्हणत असेल तर अजून कष्ट करा..पहा..काही दिवसांत आपणस आपणस हवे असणारे यश आपल्या हातात येईल..तेव्हा हेच भाव ह्रदयातून प्रगट होतील.. धन्यवाद समर्था..कोटी धन्यवाद..बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)*

*प्रेरणादायी बोल*

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!!
www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन स्वामीं काळजी घेण्यास सांगत आहेत..काळजी पण काळजी म्हणजे चिंता नव्हे तर आपण जे काही कर्म करतो..ते कर्म करताना काळजी घेण्यास स्वामीं सांगत आहेत..आपण जे काही कर्म करत आहोंत ते चुकीचे कर्म तर करत नाही ना..म्हणजे आपण जे काही कर्म करत आहोत त्यामुळे देश, समाज, वन्य जीव प्राणी यांचे आपण नुकसान तर करत नाही ना..जर आपण नुकसान करत असू व आपणस वाटत असेल की मला कुठे कोण पहात आहे.. स्वामीं पहात आहेत…! पहा रस्त्यावर कचरा टाकु नका, थुंकू नका हे आपण लहानपणा पासून ऐकतो, बोलतो..अनेक ठिकाणी बोर्ड सुद्धा असतो की असे करू नका नाही तर दंड होईल.. आपण मात्र नजर चुकवून या गोष्टी करतो..आपणस आनंद होतो की मला कुठे कुणी पाहिले..पण आपण हे विसरतो की हे स्वामीं।पहात आहेत..आपण अशी चूक करून आपण स्वतः ला तर फसवतोच त्याच बरोबर आपल्या पुढच्या पिढीचे सुद्धा नुकसान करत आहोत..ते कसे पहा आपण लहानपणी दुधा शिवाय कशालाच प्लास्टिक पिशवी वापरत नव्हतो..आपले काही अडत होते का?? आज आपण प्लास्टिक पिशवी वापरतो..त्याचा परिणाम रस्त्याच्या कडेने प्लास्टिक मध्ये कचरा..हे कर्म कुणी केले आपण..याची फळे आपण तर भोगत आहोतच पण भावी पिढी सुद्धा यांचा दुष्परिणाम भोगणार आहे..पहा…पहा ही चूक आपण करतो व म्हणतो आम्ही नाही इतर लोक..म्हणून प्रत्येक कर्म करताना स्वामीं ना भूषणावह कर्म करावे..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८)

प्रेरणादायी बोल

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. यावंर आपण चिंतन मनन करायचे आहे हे खूप महत्वाचे आहे.. आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल कि जर स्वामीं कडून अपेक्षा करायची तर मग इतरांकडून अपेक्षा करायची नाही का? असे नाही अपेक्षा करायची नाही पण अपेक्षा भंग झाला तरी वाईट वाटून नाही घ्यायचे…पहा समजा आपण एखाद्या व्यक्तीला मदत करता, तिचा आदर करता, तिला हवे नको ते सर्व देता.. त्याचे कधीच मन दुखावत नाही.. पण हे सर्व करत असताना आपल्या मनात हे विचार असतील कि भविष्यात हि व्यक्ती मला मदत करेल.. तर हे विचार म्हणजे देवघेव करण्याचे विचार झाले.. पण आपण मनात कोणतेच विचार न ठेवता समोरच्या व्यक्तीला मदत करत असेल तर हे आपले निस्वार्थ कर्म झाले.. आता भविष्यात त्या व्यक्ती ने मदत केली तर स्वामींची इच्छा.. आणि जरी त्या व्यक्तीने आपणस भविष्यात मदत नाही केली तरी हि स्वामींची इच्छा आहे  हि समज आपणस ग्रहण करायची आहे.. कारण सर्वांना प्रेरणा देणारी तीच तर शक्ती आहे.. म्हणून आपणस जी काही अपेक्षा करायची आहे ती स्वामी कडून करायची आहे कारण स्वामी आपणस तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे.. कारण जे आपल्या साठी अयोग्य आहे ते स्वामी कधीच देत नाहीत .. जेव्हा  हा विचार आपल्या अंतर्मनात कोरला जातो.. तेव्हा आपणास कोणत्याच गोष्टीचे दुःख होत नाही… म्हणेजच आपला कधीच अपेक्षा भंग होत नाही.. कारण आपण जाणतो स्वामी तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे..धन्यवाद स्वामी .. कोटी कोटी धन्यवाद… !