आपले विचार इतरांवर लादू नका!

!!श्री स्वामी समर्थ!!
हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..!

स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत आहेत..पहा हा माझा स्वतःचा अनुभव आहे..याचे उत्तर ही स्वामींनी वरील ओवीतून दिले..धन्यवाद स्वामीं..आपण काय करतो आपले जे काही विचार आहेत ते इतर व्यक्तींवर लादण्याचा प्रयत्न करतो..पहा आपल्याला कारले फार आवडते.. मग आपण आपल्या घरातील सर्वांनी किंवा जगातील प्रत्येक व्यक्ती ने कारले खाल्लेच पाहिजे हा आपण अट्टाहास करतो..कारण काय तर मला आवडते..अहो समोरील व्यक्तीला कांदा आवडतो मग तूम्हाला आवडतो का? याचे संमिश्र उत्तर असणार आहे…पहा कधी तरी आपल्या कडून काही तरी चूक होते तेव्हा आपण काय म्हणतो की मी चुकून बोललो..अहो तसेच समोरील व्यक्ती सुद्धा चुकून बोलू शकत नाही का? आपल्या मनात विचार येतात..या विचारांना प्रेरणा देणारी शक्ती आहे की नाही..कुणी तिला देव म्हणेल..कुणी स्वामीं म्हणेल..कुणी अल्लाह म्हणेल..कुणी अजून काही म्हणेल..पण सर्वांना प्रेरणा देणारा स्रोत एकच आहे..म्हणजेच ती व्यक्तीला प्रेरणा देणारे स्वामीच आहेत..तर मग आपण कसे आपले विचार कुणावर लादू शकतो..हा इथे याचा अर्थ असा नाही की एखादी व्यक्ती चुकत आहे तरी आपण आपले मत मांडायचे नाही..आपले मत असे मांडा की समोरच्या व्यक्ती ला असे वाटू नये की आपण विरोध करत आहोत…धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद..!

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रोज ११ वेळेस म्हणा

!! श्री स्वामी समर्थ !!

स्वामी भक्तहो कोणतीही आर्थिक समस्या नसून आपल्या विचारातील मानसिकता आहे.. आपल्या अंतर्मनातील विचार आहेत.. चला आपले विचार बदल्या.. खालील विचार रोज १ वेळेस किंवा ११ वेळेस म्हणा पहा काय बदल घडतात.. धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद !!

हे मना मला कोणतीही आर्थिक समस्या नाहीये.. आवश्यकतेनुसार मुबलक पैसे मला मिळत आहेत.. त्यातून माझ्या सर्व गरजांची पूर्तता होत आहे तसेच भरपूर पैसे देखील saving होत आहेत.. धन्यवाद लक्ष्मी देवता.. आजपर्यंत मी चुकीची वाक्ये उच्चारली त्याबद्दल मला माफ कर.. तू माझ्या सर्व गरजांची पूर्तता तर करतेस च. तसेच मुबलक प्रमाणात माझ्याकडे येतोस त्याबद्दल धन्यवाद..असाच तुझा प्रवाह सर्वांच्या जीवनात वाढत राहो.. धन्यवाद

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस.

स्वामी वाणी पुष्प ५९३(पर्व ४ थे भाग ९७)

प्रेरणादायी बोल

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस..अरे विश्वास ठेवा !! प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात.. स्वामींची सम्पूर्ण शक्ती असते..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. स्वामी महाराज आजच्या स्वामी वाणी तुन आपणस.. प्रामाणिक कष्ट करण्यास सांगत आहेत.. प्रामाणिकपणा हा असा गुण आहे ज्या साठी साधनेची आवश्यकता आहे.. पहा आपल्या मनात येईल कि आजच्या काळात प्रामाणिक पणे काम करणे शक्यच नाही.. पहा आपण इतरांकडून प्रामाणिक पणाची अपेक्षा करतो मग सर्वप्रथम आपणस हा गुण आपल्यात धारण करणे आवश्यक नाही का? आपण जसे पेरतो तसेच उगवते.. प्राणिकपणाने चालताना आपणस अडचणी येतील.. पण त्या अडचणींवर मात करून जर आपण आपल्यातील प्रामाणिकपणा हा गुण सोडला नाही तर आपण याचा अर्थ प्रामाणिक कष्ट करत आहोत.. खरंतर यास कष्ट न म्हणतात आपण स्वामींची प्रामाणीक सेवा म्हणू शकतो कारण आपण प्रत्येक कर्म स्वामी सेवा समजून करतो ना.. कधी कधी आपणस अमुक एखादे काम करताना लाज वाटते आपले मन म्हणते कि मी हे काम कसे करू.. खरंतर कोणतेच काम छोटे नसते वा मोठे नसते जेव्हा आपण ते करत असताना हा भाव ठेवू कि हि स्वामी सेवा आहे.. जेव्हा अशा भावनेने आपण प्रामाणिक कष्ट करतो तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात.. आपणस कार्य करण्यास बळ देत असतात.. म्हणून आज पासून आपणस आपल्यातील प्रामाणिक कष्ट करण्याचा गुण अवगत करायचा आहे.. धन्यवाद समर्था.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

यशाला कधीच शॉर्टकट नसतो.

स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५)

प्रेरणादायी बोल

हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!!
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच सांगितलं आहे.. यश हवे असले तर कधीच शॉर्टकट नसतो… आपणा सर्वांना यश हवे आहे.. मग यश प्राप्त करण्यासाठी आपण काय करतो हे खूप महत्वाचे आहे.. जर आपणस शाश्वत यश हवे असेल तर आपणस कष्टच करावे लागतील.. पहा दोन विद्यार्थी आहेत.. दोघेही हुशार आहेत.. कारण ईश्वर सर्वाना समान बुद्धिमत्ता देतो.. एक विद्यार्थी रोजचा अभ्यास रोज पूर्ण करतो… त्या विषयावरील सर्व प्रश्न असतील त्यांचा अभ्यास करतो.. म्हणजेच रोजचा अभ्यास रोज पूर्ण करतो.. दुसरा विद्यार्थी हा वर्ष भर अभ्यास करत नाही.. मात्र परीक्षेच्या वेळेस दिवस रात्र जागरण करतो.. पहा जेव्हा निकाल लागेल तेव्हा कुणास घवघवती यश मिळेल.. ज्या विद्यार्थ्याने रोज अभ्यास केला त्याला.. दुसरा विद्यार्थी पास होईल कि नापास होईल यांची शाश्वती नाही म्हणजेच यश मिळेल याची खात्री नाही म्हणजेच यश हे नेहमी त्यालाच मिळते जो स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट करतो त्यालाच.. हाच नियम आपणस जीवनातील प्रत्येक क्षेत्राला लागू पडतो.. जेव्हा आपले कर्म हे स्वामी सेवा या भावनेने करू त्यात कष्ट करताना आपण कोणतीही कमतरता ठेवत नाही तेव्हा आपणस शाश्वत यश मिळतेच.. म्हणून स्वामी भक्तहो न थकता.. न थांबता अखंड कर्म रुपी सेवा सुरु ठेवूया .. धन्यवाद समर्था ..बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६)

प्रेरणादायी बोल
आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!!
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया…अक्कलकोट गावात स्वामी प्रथम गावा बाहेरील खंडोबाच्या मंदिरात आले. तीन दिवस हे परब्रम्ह उपाशी होते. अहमद अलीखान ह्या रिसालदार ने स्वामींना एक वेडा व्यक्ती समजून मजाक मध्ये रिकामी चिलीम देऊन ” हुक्का पीता का?” असे विचारले…तेव्हा स्वामीनी ‘ हो मी हुक्का पितो !!’ असे म्हणून रिकामी चिलीम हातात घेतली आणि ओढण्यास सुरुवात केली तर चमत्कार असा घडला कि त्या चिलीम मधून धूर यायला लागला… हा चमत्कार बघून रिसालदार आश्चर्य चकित झाला आणि महाराज कोणीतरी अवलिया असावेत ह्याची त्याला खात्री झाली ..ह्या नंतर स्वामी तीन दिवस उपाशीच आहे हे समजल्या नंतर चोळप्पाच्या घरी स्वामींना जेवणासाठी नेले …
चोळप्पाच्या घरी जेवणास गेल्या नंतर स्वामीनी सर्वप्रथम रीसालदारास ताटाला हात लावण्यास सांगितले ..पण मी मुसलमान ताटाला हात कसा लावू म्हणून त्याचे धाडस झाले नाही ..पुन्हा स्वामीनी पुन्हा आज्ञा केली अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल !! मग मात्र रिसालदाराने ताटाला हात लावला.. आणि त्या नंतर स्वामींनी जेवण केले .


बोध

स्वामी तर परब्रम्ह आहे..खोल महासागराच्या तळाशी असलेल्या छोट्याश्या मासोळीच्या अन्नाची सोय स्वामीनी केली आहे मग त्यांना तीन दिवस उपाशी राहण्याची गरज काय ? हा प्रश्न सहाजिकच आहे .. खरे तर..स्वामीच्या मनातील आपण काय ओळखणार? पण भक्तीयुक्त अंत:करणाने स्वामिनीच जे मनन करवून घेतले त्यातून असे समजते कि , ह्या आगळ्या वेगळ्या अवतारात स्वामीनी अक्कलकोट हे स्थान पुढील कार्या साठी निश्चित केले होते.. ह्यातूनच अहमद अलीखान च्या हाताने एका हिंदू घरात स्वामीनी जेवण करून “ईश्वरा समोर कुणी हिंदू नाही अथवा कुणी मुसलमान नाही तो फक्त भक्ती भावनेचा भुकेला आहे ” हा स्पष्ट संकेत दिला आणि विशेष म्हणजे अशा काळात कि ज्या काळात हे स्पृश्य अस्पृश्य असे कर्मकांड स्तोम जास्त माजलेले होते..