कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

Sep 15, 2025 | मराठी

Share

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला.

महर्षींनी सांगितले की हा रोग त्याच्या पूर्वजन्मीच्या पापांचा परिणाम आहे — त्या जन्मी तो “कामद” नावाचा व्यापाऱ्याचा मुलगा होता, ज्याने क्रूरपणे निरपराध लोकांची हत्या केली होती, त्यामुळे त्याला शाप मिळाला होता.

महर्षींनी त्याला उपाय सांगितला — गणेशभक्ती. राजा एका जीर्ण गणेश मंदिरात गेला, उपाशी असूनही भक्तिभावाने उपासना करू लागला आणि आपल्या धनाने मंदिराचा जीर्णोद्धार केला. यामुळे त्याचे पाप क्षीण झाले.

गणेश उपासनेच्या सामर्थ्याने त्याचे पापरूपी विकराळ रूप त्याच्यापासून वेगळे झाले आणि नाहीसे झाले. शेवटी महर्षींच्या कृपेने व गणेशपुराण श्रवणामुळे त्याचा कुष्ठरोगही नाहीसा झाला.

बोध . आपण जे काही करम करतो त्याचे फळ आपणास भोगावेच लागते…पण सत्कर्म करून आपण जी काही चुकीचे कर्म केली असतील..त्याची तीव्रता कमी करू शकतो…राजा असो किंवा अजून कुणी असो..प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब द्यावाचा लागतो…त्यामुळे प्रत्येक कर्म करत असताना आपण सावध असणे आवश्यक आहे…अनेकदा आपण चुकीचे कर्म करताना आपणास असे वाटते की मला कुणी पहात नाही…जरी बाहेरचे कुणी पहात नसेल..तरी आपले कर्म हे आपणच पहात असतो..जसे इतरांचे वाईट कर्मावर आपण न पाहता बोट ठेवू शकतो..तर आपणच केलेल्या कर्मा पासून आपली सुटका कशी होईल..म्हणून प्रयत्न करू चांगले कर्म करण्याचे…जरी चुकून वाईट कर्म झाले असेल..तर नक्कीच त्याबद्दल माफी मागा… पहा आपली चूक आपण मान्य करणे हे सुद्धा एक चांगले कर्म आहे..यातून आपण आपली अंतर्गत शुद्धी करतो..पण चूक मान्य करणे ही क्रिया सुद्धा मना पासून असावी…पहा आज आपल्या जीवनात सुख दुःख आहेत…किंवा असणार आहेत..ती आपल्याच कर्माची फळ असणार आहेत..त्यामुळे प्रत्येक कर्म हे विचार पूर्वक करूया…त्या साठी..गणपती बाप्पा कडेच प्रार्थना करूया…! बोला गणपती बाप्पा मोरया..!
प्रार्थना… हे गणपती बाप्पा…आज जी काही सुख किंवा दुःख आमच्या जीवनात आहेत..ती आमच्या कर्माचीच फळे आहेत…आज राजा
सोमकांत याची गोष्टीला निमित्ताने तू आम्हाला प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते याची जाणीव करून दिलीस त्याबद्दल धन्यवाद…आम्हाला प्रत्येक कर्म करताना या नियमाची आठवण असू दे..आम्ही हे विसरणारच..पण तू तर बुद्धी दाता आहेस…आम्हाला सदैव जागृत अवस्थेत कर्म करून घे…चुकीचे कर्म करण्यापूर्वी आम्हाला त्या कर्माची जाणीव करून दे… चांगल्या कर्मा साठी आम्हाला तयार कर.. हे तुझ्या कृपे शिवाय शक्य नाही…सदैव कृपा कर…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…ही समज दिल्याबद्दल धन्यवाद…बोला गणपती बाप्पा मोरया..!


Share
और पढिये !!

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...