श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

Sep 14, 2025 | मराठी

Share

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला
एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?”
शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.”
सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते लहान मूषक.गणेशजींनी मनाशी विचार केला –“विश्व म्हणजेच आईवडील. त्यांच्या प्रदक्षिणेनेच संपूर्ण परिक्रमा पूर्ण होते.”आणि त्यांनी आई-पित्याची प्रदक्षिणा केली.बोला गणपती बाप्पा मोरया..!
बोध:वरील कथा ही खरंतर आपल्यासाठी आहे पहा..जसे गणपती बाप्पा चे वाहन मूषक आहे..वाहन छोटे पण महत्त्वाचे आहे..आपल्या जीवनात ही अनेकदा अनेक लहान लहान गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण आपल्या कडे जे आहे ते न पहाता..म्हणतो माझ्याकडे एवढेच आहे…जसे माझ्या कडे सायकल आहे…गाडी नाही..पण आपण आपण आपल्या कडे जे आहे त्यातून खूप काही करू शकतो..फक्त आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे…बाप्पा नी आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली…म्हणजेच काय आपले आद्य कर्तव्य या ठिकाणी बाप्पा सांगत आहेत..आधी आपली आई..वडिलांची सेवा करा..तोच धर्म आहे..तोच कल्याणाचा मार्ग आहे…इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता असेल तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो…प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी केवळ बाह्य परिस्थितीकडे पाहू नये; योग्य विचार महत्त्वाचा आहे….बोला गणपती बाप्पा मोरया…चला बाप्पा ला प्रार्थना करूया…
प्रार्थना..हे गणपती बाप्पा..तू माता पिता यांना प्रदक्षिणा घालून विश्व प्रदक्षिणा करून आम्हाला आई वडिलांच्या सेवेचे महत्व पटवून दिले आहेस..मात्र आम्ही इतर सर्व करतो…पण आई वडिलांची सेवाच विसरतो… आमच्या वर कृपा कर..आणि आमच्याकडून आई वडिलांची सेवा घडू दे… आमच्या मुळे त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ नयेत…आमच्यातील सेवा भाव इतका दृढ कर की..आमची मातृ पितृ सेवा पाहून…इतरांनाही प्रेरणा मिळेल…कोणतेच आई वडील वृद्धाश्रमात नसतील…ही बुद्धी सर्वांना दे..कारण तुझ्या कृपेने हे शक्य आहे…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..! बोला गणपती बाप्पा मोरया..!
www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...