श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

Sep 14, 2025 | मराठी

Share

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला
एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?”
शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.”
सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते लहान मूषक.गणेशजींनी मनाशी विचार केला –“विश्व म्हणजेच आईवडील. त्यांच्या प्रदक्षिणेनेच संपूर्ण परिक्रमा पूर्ण होते.”आणि त्यांनी आई-पित्याची प्रदक्षिणा केली.बोला गणपती बाप्पा मोरया..!
बोध:वरील कथा ही खरंतर आपल्यासाठी आहे पहा..जसे गणपती बाप्पा चे वाहन मूषक आहे..वाहन छोटे पण महत्त्वाचे आहे..आपल्या जीवनात ही अनेकदा अनेक लहान लहान गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण आपल्या कडे जे आहे ते न पहाता..म्हणतो माझ्याकडे एवढेच आहे…जसे माझ्या कडे सायकल आहे…गाडी नाही..पण आपण आपण आपल्या कडे जे आहे त्यातून खूप काही करू शकतो..फक्त आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे…बाप्पा नी आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली…म्हणजेच काय आपले आद्य कर्तव्य या ठिकाणी बाप्पा सांगत आहेत..आधी आपली आई..वडिलांची सेवा करा..तोच धर्म आहे..तोच कल्याणाचा मार्ग आहे…इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता असेल तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो…प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी केवळ बाह्य परिस्थितीकडे पाहू नये; योग्य विचार महत्त्वाचा आहे….बोला गणपती बाप्पा मोरया…चला बाप्पा ला प्रार्थना करूया…
प्रार्थना..हे गणपती बाप्पा..तू माता पिता यांना प्रदक्षिणा घालून विश्व प्रदक्षिणा करून आम्हाला आई वडिलांच्या सेवेचे महत्व पटवून दिले आहेस..मात्र आम्ही इतर सर्व करतो…पण आई वडिलांची सेवाच विसरतो… आमच्या वर कृपा कर..आणि आमच्याकडून आई वडिलांची सेवा घडू दे… आमच्या मुळे त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ नयेत…आमच्यातील सेवा भाव इतका दृढ कर की..आमची मातृ पितृ सेवा पाहून…इतरांनाही प्रेरणा मिळेल…कोणतेच आई वडील वृद्धाश्रमात नसतील…ही बुद्धी सर्वांना दे..कारण तुझ्या कृपेने हे शक्य आहे…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..! बोला गणपती बाप्पा मोरया..!
www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...