मन निर्भय कसे बनवावे

May 4, 2025 | Uncategorized

Share

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा आहे.. पहा जर प्रामाणिक पणे विचारला तर उत्तर काही प्रमाणात हा येईल .. काही प्रमाणात नाही येईल.. आता निर्भयता म्हणजे काय ? आपल्या मनात असणारी भीती दूर करणे.. आता नेमकी भीती कशा कशाची असू शकते किंवा असते.. मला अपयश येईल का ? कोणतेही काम करण्या पूर्वी हि मनांत भीती निर्माण होते.. मी जर एखादे चांगले काम केले आणि त्यात अपयश आले तर लोक काय म्हणतील.. मी एकटाच आहे मी हे काम कसे करू… माझे भविष्यात कसे होईल .. मी एखादे काम करताना पडेल का.. अश्या अनेक गोष्टी असतात ज्याची आपल्या मनात भीती असते.. मग हीच भीती आपल्या मनात बसते.. आपले मन भीतीने ग्रस्त होते.. मग आपण अपयशी होतो.. अनेकदा आपण स्वामी सेवा हि करत असतो पण तरी आपल्या मनात असणारी भीती मुळे आपली सेवा सुद्धा यांत्रिक होते.. मग कधी अपयश आले कि मन म्हणते मी इतकी सेवा करतो .. असे करतो तसे करतो पण तरी मी अपयशी होतो.. आता पहा खरंतर स्वामी आपणस निर्भयता हा गुण विकसित करण्यास सांगत आहेत .. जिथे निर्भयता तिथे यश.. आता इथे एक गोष्ट आपणस सांगावीशी वाटते ती म्हणजे निर्भयता म्हणजे लोकांवर अन्याय करणे नव्हे .. आता हा निर्भयता हा गुण विकसित करण्यासाठी काय करावे यावर आपण चिंतना करू.. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे आपल्यात प्रामाणिकपणा हा गुण विकसित करावा.. अपयश जरी आले तरी मी त्यातुन शिकणार आहे.. निर्भयता येण्यासाठी जे काही चरित्र असतील ते वाचाव्यात .. त्या चरित्रावर पुन्हा मनात चिंतन मनन करावे.. नेमके आपल्या मनात जी भीती आहे ती का आहे.. त्या भीतीच्या मुळावर काम करावे.. जसे मनात भीती आहे मी चुकलो तर.. मग विचार करा मी जरी चुकलो तरी त्या चुकेवर चिंतन मनन करून जी काही चूक झाली आहे ती चूक पुन्हा होऊ देणार नाही आणि मी यशस्वी होईलच.. रोज थोडा वेळ स्वामी नाम घ्या.. थोडावेळ ५ मिनिटे ध्यान करा.. स्वामींना प्रार्थना करा .. मला निर्भय बनव.. निर्भयता हा गुण विकसित करण्यासाठी मला मदत करा.. पहा रोजच्या सरावाने आपल्यातील मनांतील भीती दूर होईल.. आपल मन निर्भय होईल.. मग यश आपले दार ठोठावेल.. पहा आपणही यावर चिंतन मनन करावे आणि स्वामी सेवा आणि निर्भय मनाने यशाला गवसणी घालावी.. धन्यवाद स्वामी .. कोटी धन्यवाद .. हि सेवा करून घेतल्या बद्दल धन्यवाद

www.chetankeswar.com


Share
और पढिये !!

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...