अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

Dec 10, 2024 | ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

Share

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि तितक्यात चमत्कार झाला कृष्णाप्पाने हालचाल केली आणि जिवंत झाला.. सर्वांनी आनंदाने स्वामींचा जयजयकार केला ..धन्य स्वामी !! धन्य स्वामी लीला !! बोला स्वामी महाराज कि जय हो !!
स्वामी भक्त हो..अनेकदा आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात की आपण हताश होतो..आपणास असे वाटते की सर्व काही संपले आहे…आपण शरीराने असतो..पण मनाने हताश झालेले असतो…खरतर अश्या वेळेस आपणास मनाला सांगता आले पाहिजे…किंबहुना आपल्या अंतर्मनात हे रुजवावे… जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा..वरील लीला वाचताना श्रवण करताना आपणास अनेक प्रश्न निर्माण होतात…असे कसे…पण आपण जेव्हा आपण श्रध्दा पूर्वक या लीले कडे पाहू तेव्हा आपणास जाणवते..की ही लीला आपल्या साठी आहे…संकट किंवा अडचण असते तेव्हा आपली अवस्था ही मृत कृष्णप्पा सारखी असते..आपण शरीराने जिवंत असतो..पण मानसिक दृष्ट्या मृत असतो…अश्या वेळेस आपणास काय करायचे आहे..चोळप्पा महाराज प्रमाणे स्वामी चरणी लीन व्हायचे आहे…मुखी स्वामी नाम घ्यायचे…आणि मनाला तारक मंत्राची आठवण करून देत…प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे..एकदा आपले मन जिंकले की आपण ही कृष्णाप्पा प्रमाणे आपल्या जीवनात येणाऱ्या संकटाना सामोरे जावू आणि यशस्वी होऊ…म्हणजेच मृत्यु येण्यापूर्वी आपण मरणार नाही तर लढणार…(इथे महत्वाची गोष्ट..ज्या दिवशी आपला मृत्यू आहे तेव्हा तो येणारच आहे..फकत जिवंत पणी लढून जिंकायचे आहे…धन्यवाद स्वामी
संदर्भ: स्वामी वाणी ३
www.chetnakeswar.com

स्वामी भक्त हो..कितीही संकटं येऊ द्या..पण जीवंतपणे मनाने हरू नका…कारण स्वामी भक्त हरत नाही..तर लढतो आणि संकटाचा सामना करून यशस्वी होतोच… धन्यवाद स्वामी…!
www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...