चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

Jan 14, 2024 | Uncategorized

Share

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो “स्वामी भक्तीत रहावे” स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो शक्य आहे.. प्रत्येक कर्म जेव्हा आपण स्वामी सेवा आहे या भावनेनं करू तेव्हा त्याचा अर्थ आपण स्वामी भक्तीत आहोत.. जसे आपण सकाळी स्वामी नाम घेऊन घरा बाहेर पडलो.. आता आपण २४ तास स्वामी नाम घेऊ शकत नाही आणि स्वामींना ते अपेक्षित नाही.. तर आपण ज्या काही चांगल्या कामासाठी घरा बाहेर पडलो आहोत.. ते काम स्वामींनी मला दिले आहे.. मी ते प्रामाणिकने करणार.. हा भाव ठेवून.. आपण जेव्हा ते काम करतो तेव्हा ते काम म्हणजेच स्वामी भक्तीत राहणे होय..आता इथे थोडी गल्लत होऊ शकते कि स्वामी सेवा म्हणजे आपण पैसे कमवणार नाही का? असे नाही तर आपण जे काम करत आहोत त्यात गुणवत्ता देणे म्हणजे.. स्वामी भक्ती.. जसे आपण चहा चा व्यवसाय करत आहोत.. तेव्हा आपल्या कडे येणार ग्राहक हे स्वामींनी पाठवले आहेत.. त्यांना चांगला चहा देणे हि माझी स्वामी सेवाच आहे.. जेव्हा हा भाव आपल्यात जागृत होईल.. आपण तो आपल्या अंतकरणात कोरू .. त्यावर तसे करू त्यावेळी आपण स्वामी भक्तीतच असतो.. पहा आपण यावर चिंतन मनन करा नक्कीच आपले प्रत्येक कार्य हि स्वामी भक्ती होईल.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय .. ! www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...