शिव पुराण कथा ४

Oct 8, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

शिव पुराण कथा 4

शिव पुराण कथा श्रवण किंवा वाचन करताना कोणते नियम पाळावेत याचे वर्णन श्री शिव महापुराण मध्ये येते.. सर्वप्रथम आपले आप्तेष्ट घरातील मंडळी यांच्याशी आपण चर्चा करावी कि आपणस श्री शिव महा पुराण कथा करणार आहोत तर कधी करावी.. त्यात प्रत्येकाचे मत विचारात घ्यावे कारण सर्वांच्या विचाराने झालेले कार्य सफल होते.. आपण हि घरच्या घरी वाचणार असाल तर शक्यतो सर्वांना श्रवण करता  येईल असा मुहूर्त आपण शोधावा.. जर आपण शिव मंदिरात किंवा इतर ठिकाणी करणार असाल तर याबाबत अनेक शिव भक्तांना याचा लाभ घेता येईल अशी काळजी घ्यावी.. शिव पुराणात वर्णन येते कि केळीच्या खुंटाचा मंडप असावा.. आज आपण विचार केला तर आज अनेक मंडप आहेत.. हॉल आहेत अनेक सुविधा आहेत त्याचा आपण वापर करू शकतो.. जेणेकरून ऊन , वारा , पाऊस याचा व्यत्यय कथेत येणार नाही.. कथेच्या ठिकाणी भगवान शिव यांच्या साठी आसन  असावे.. आता यात आपला भाव महत्वाचा कारण मग आपल्या मनात प्रश्न येईल असेच आसन हवे तसे नको.. इथे आपण फुलाचे आसन करू शकतो.. आता आपण जी कथा श्रवण करणार आहोत त्या ग्रंथासाठी हि उच्च आसन असावे .. म्हणजे काय तर ग्रंथ वाचताना त्या खाली चौरंग, पाट किंवा आणखी कोणते आसन असावे.. याचा फायदा जे वाचणार आहेत त्यांना हि वाचताना सोपे झाले पाहिजे.. आपल्या कडे प्रथा आहे कि ग्रंथ आणि ग्रंथ वाचक यांचे आसन नेहमी उच्च असावे आता.. यामागचे कारण आपल्यात अधिकाधिक भक्ती भाव जागृत व्हावा.. जे कथा वाचणार आहेत त्यांनी त्या ग्रंथानुसार आचारण करण्याचा प्रयत्न करावा कारण.. शिव पुराण हा नुसता ग्रंथ नसून ते शिव तत्त्व आहे.. शिव पुराण  मुळातच आपणस शुद्ध चित्त ठेवण्यास सांगते.. आता इथे आपल्या मनात प्रश्न येईल कि आम्ही तर प्रथमच शिव पुराण घरात वाचत आहोत.. मग आम्हाला कसे कळणार.. शिव पुराण वाचले कि आपणास आपल्यातील दोष जाणवतात.. ते दोष दूर केले म्हणजेच नियमांचे पालन झाले.. शिव पुराण मध्ये सांगितले आहे कि जे कुणी कथा वाचणार आहेत जर त्यांना काही अडचण आली तर दुसरे कुणीतरी ती कथा वाचू शकेल याची सुद्धा आपण काळजी घ्यावी.. आता कथेस सुरवात करण्यापूर्वी.. आपण आवश्यक त्या प्रार्थना जसे गणपती पूजा, ग्रंथ पूजा करावी.. काहीच शक्य नसेल तर भगवान महादेवांना प्रार्थना करावी कि आपल्या कृपने आम्ही ग्रंथ वाचन श्रवण करत आहोत आमच्याकडून सेवा करून घे.. शुद्ध भाव ठेवून कथा श्रवण किंवाव वाचन करावी असा उल्लेख श्री शिव महा पुराण  मध्ये येतो.. सात्विक अन्न ग्रहण करावे.. आता सात्विक अन्न म्हणजे असे अन्न  ज्याने आपले पोट नरम राहील शरीरात ऊर्जा असेल असे अन्न.. कथा श्रवण आणि वाचन याचे व्रत घेतले कि त्या बरोबर आणखी एक व्रत घेण्याचा उल्लेख श्री शिव महा पुराणात येतो.. ते व्रत म्हणजे काम, क्रोध , मोह, मंद मत्सर आणि घृणा याचा त्याग करावा.. कुणाची निंदा करू नये.. सत्य , मौन , सरळ आचरण, विनम्रता त्याच प्रमाणे मनात कोणत्याही प्रकारचे किंतु परंतु न ठेवता याचे श्रवण पठण करावे.. कथेची सांगता करताना आपल्या क्षमते नुसार अन्न दान करावे.. तसेच रोज शिव पंचाक्षर मंत्राचा जप करावा ‘ॐ नमः शिवाय’ आता सर्वांच्या मनात प्रश्न असतो कि कथा वाचून किंवा श्रवण करून काय होईल.. खरं सांगु काहीच होणार नाही जर आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास नसेल तर.. कारण श्री शिव महा पुराण कथा आपणस आपल्या स्वतः वर काम करण्यास शिकवते.. पहा जेव्हा आपण आपल्यात बदल करू तेव्हा नक्कीच श्री शिव महा पुराण कथेच्या श्रवण पठण याचा जो काही फायदा होईल तो आपला आपल्यालाच जाणवेल.. नक्की आपण वाचण्याचा श्रवण करण्याचा प्रयत्न करावा.. आणि नसते वाचन किंवा श्रवण न करता त्या नुसार आपल्यात बदल करावा.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’

चला आपण सर्व मिळून श्री महादेवांना प्रार्थना करूया.. हे महादेवा तुझे चरित्र वाचन किंवा श्रवण करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दे.. जसे तुझ्या चरित्रात वर्णन येते त्या नुसार आमच्या जीवनात… आमच्या स्वतः मध्ये बदल करण्याची बुद्धी आम्हाला दे.. कारण तुझे चरित्र तर आम्हाला आमच्यातील दोष करण्याची प्रेरणाच देत आहेत.. धन्यवाद महादेवा… हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद… बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !www.chetanakeswar.com

 


Share
और पढिये !!

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...