शिव पुराण कथा ४

Oct 8, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

शिव पुराण कथा 4

शिव पुराण कथा श्रवण किंवा वाचन करताना कोणते नियम पाळावेत याचे वर्णन श्री शिव महापुराण मध्ये येते.. सर्वप्रथम आपले आप्तेष्ट घरातील मंडळी यांच्याशी आपण चर्चा करावी कि आपणस श्री शिव महा पुराण कथा करणार आहोत तर कधी करावी.. त्यात प्रत्येकाचे मत विचारात घ्यावे कारण सर्वांच्या विचाराने झालेले कार्य सफल होते.. आपण हि घरच्या घरी वाचणार असाल तर शक्यतो सर्वांना श्रवण करता  येईल असा मुहूर्त आपण शोधावा.. जर आपण शिव मंदिरात किंवा इतर ठिकाणी करणार असाल तर याबाबत अनेक शिव भक्तांना याचा लाभ घेता येईल अशी काळजी घ्यावी.. शिव पुराणात वर्णन येते कि केळीच्या खुंटाचा मंडप असावा.. आज आपण विचार केला तर आज अनेक मंडप आहेत.. हॉल आहेत अनेक सुविधा आहेत त्याचा आपण वापर करू शकतो.. जेणेकरून ऊन , वारा , पाऊस याचा व्यत्यय कथेत येणार नाही.. कथेच्या ठिकाणी भगवान शिव यांच्या साठी आसन  असावे.. आता यात आपला भाव महत्वाचा कारण मग आपल्या मनात प्रश्न येईल असेच आसन हवे तसे नको.. इथे आपण फुलाचे आसन करू शकतो.. आता आपण जी कथा श्रवण करणार आहोत त्या ग्रंथासाठी हि उच्च आसन असावे .. म्हणजे काय तर ग्रंथ वाचताना त्या खाली चौरंग, पाट किंवा आणखी कोणते आसन असावे.. याचा फायदा जे वाचणार आहेत त्यांना हि वाचताना सोपे झाले पाहिजे.. आपल्या कडे प्रथा आहे कि ग्रंथ आणि ग्रंथ वाचक यांचे आसन नेहमी उच्च असावे आता.. यामागचे कारण आपल्यात अधिकाधिक भक्ती भाव जागृत व्हावा.. जे कथा वाचणार आहेत त्यांनी त्या ग्रंथानुसार आचारण करण्याचा प्रयत्न करावा कारण.. शिव पुराण हा नुसता ग्रंथ नसून ते शिव तत्त्व आहे.. शिव पुराण  मुळातच आपणस शुद्ध चित्त ठेवण्यास सांगते.. आता इथे आपल्या मनात प्रश्न येईल कि आम्ही तर प्रथमच शिव पुराण घरात वाचत आहोत.. मग आम्हाला कसे कळणार.. शिव पुराण वाचले कि आपणास आपल्यातील दोष जाणवतात.. ते दोष दूर केले म्हणजेच नियमांचे पालन झाले.. शिव पुराण मध्ये सांगितले आहे कि जे कुणी कथा वाचणार आहेत जर त्यांना काही अडचण आली तर दुसरे कुणीतरी ती कथा वाचू शकेल याची सुद्धा आपण काळजी घ्यावी.. आता कथेस सुरवात करण्यापूर्वी.. आपण आवश्यक त्या प्रार्थना जसे गणपती पूजा, ग्रंथ पूजा करावी.. काहीच शक्य नसेल तर भगवान महादेवांना प्रार्थना करावी कि आपल्या कृपने आम्ही ग्रंथ वाचन श्रवण करत आहोत आमच्याकडून सेवा करून घे.. शुद्ध भाव ठेवून कथा श्रवण किंवाव वाचन करावी असा उल्लेख श्री शिव महा पुराण  मध्ये येतो.. सात्विक अन्न ग्रहण करावे.. आता सात्विक अन्न म्हणजे असे अन्न  ज्याने आपले पोट नरम राहील शरीरात ऊर्जा असेल असे अन्न.. कथा श्रवण आणि वाचन याचे व्रत घेतले कि त्या बरोबर आणखी एक व्रत घेण्याचा उल्लेख श्री शिव महा पुराणात येतो.. ते व्रत म्हणजे काम, क्रोध , मोह, मंद मत्सर आणि घृणा याचा त्याग करावा.. कुणाची निंदा करू नये.. सत्य , मौन , सरळ आचरण, विनम्रता त्याच प्रमाणे मनात कोणत्याही प्रकारचे किंतु परंतु न ठेवता याचे श्रवण पठण करावे.. कथेची सांगता करताना आपल्या क्षमते नुसार अन्न दान करावे.. तसेच रोज शिव पंचाक्षर मंत्राचा जप करावा ‘ॐ नमः शिवाय’ आता सर्वांच्या मनात प्रश्न असतो कि कथा वाचून किंवा श्रवण करून काय होईल.. खरं सांगु काहीच होणार नाही जर आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास नसेल तर.. कारण श्री शिव महा पुराण कथा आपणस आपल्या स्वतः वर काम करण्यास शिकवते.. पहा जेव्हा आपण आपल्यात बदल करू तेव्हा नक्कीच श्री शिव महा पुराण कथेच्या श्रवण पठण याचा जो काही फायदा होईल तो आपला आपल्यालाच जाणवेल.. नक्की आपण वाचण्याचा श्रवण करण्याचा प्रयत्न करावा.. आणि नसते वाचन किंवा श्रवण न करता त्या नुसार आपल्यात बदल करावा.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’

चला आपण सर्व मिळून श्री महादेवांना प्रार्थना करूया.. हे महादेवा तुझे चरित्र वाचन किंवा श्रवण करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दे.. जसे तुझ्या चरित्रात वर्णन येते त्या नुसार आमच्या जीवनात… आमच्या स्वतः मध्ये बदल करण्याची बुद्धी आम्हाला दे.. कारण तुझे चरित्र तर आम्हाला आमच्यातील दोष करण्याची प्रेरणाच देत आहेत.. धन्यवाद महादेवा… हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद… बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !www.chetanakeswar.com

 


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...