प्रार्थना कोणती पूर्ण होते

Sep 22, 2023 | Uncategorized, प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

प्रार्थना – आपण लहान पणा पासून ऐकतो प्रार्थना करत आलो आहोत.. आपण हि आपल्या मुलांना हि प्रार्थना करण्यास सांगतो.. पण प्रार्थना म्हणजे असते तरी काय.. हृदयातून निघालेला आवाज जो सर्वांचा हित दायक असतो त्यास आपण प्रार्थना म्हणू शकतो आता याची अशी एकच व्याख्या करणे अवघड आहे.. कारण प्रत्येकाच्या या बाबत वेगवेगळे मत आहेत.. पण आपण जर अनेक प्रार्थना पाहिले तर आपणस जाणवते कि.. प्रार्थना हि नेहमी विश्व कल्याण करणारी असते हे आपणस जाणवते..आपण अनेकदा व्यक्तिगत प्रार्थना करतो.. त्या पूर्ण होण्यास वेळ लागतो.. पण जेव्हा आपण सर्व समावेशक म्हणजेच अव्यक्तिगत प्रार्थना करतो तेव्हा ती लवकर पूर्ण होते.. जसे पसायदान आपण जर या वर चिंतन मनन केले तर आपणस जाणवेल माऊलींनी विश्वाचे कल्याण व्हावे या साठीच प्रार्थना केली आहे.. आपण प्रार्थना करताना ती कोणत्या भाषेत वा शब्दांत करतो या पेक्षा आपले भाव महत्वाचे आहेत..आपण रोज प्रार्थना करताना प्रयत्न करा कि सर्वांसाठी प्रार्थना करूया.. पहा आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल कि सर्वांसाठी का ? पहा आपल्या सर्वांचे सुख हे एकमेकांवर अवलंबून आहे.. पहा समजा माझा कपडे विकण्याचा व्यवसाय आहे.. मी म्हंटल कि माझा चालू दे.. तर हि प्रार्थना अपूर्ण आहे.. कारण माझा व्यवसाय हा ग्राहकावर अवलंबून आहे.. ग्राहक तेव्हाच येईल जेव्हा त्या कडे पैसे असतील.. त्या कडे तेव्हाच पैसे येतील जेव्हा तो जिथे नोकरी करत असेल तो व्यवसाय व्यवस्थित चालत असेल.. म्हणजेच प्रत्येकाचे सुख हे एकमेकांवर अवलंबून आहे.. जर इतर सुखी होतील तरच आपण हि सुखी होऊ शकतो.. म्हणून मला प्रार्थना करताना अशी करावी लागेल कि.. सर्वांचा व्यवसाय , नोकरी मध्ये यश प्राप्त होऊ दे.. म्हणजेच प्रार्थना व्यक्तिगत न राहता.. विश्वकल्याणाची होईल.. आपणस जी काही प्रार्थना सुचते ती नेहमी लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा.. पहा आपल्याच प्रार्थना भविष्यात आपणस प्रेरणा देतील.. चला तर मग आजपासून आपल्या प्रार्थना बदलूया.. आपले जीवन बदलूया.. धन्यवाद स्वामी..!
या बाबत आपले अभिप्राय आपण आम्हाला – chetnakeswar.com@gmail.com यावर पाठवू शकता


Share
और पढिये !!

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...