शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार दिला.. हा नकार ऐकताच त्यांना फार राग आला आणि त्यांनी त्या नोकराला मारले इतके मारले कि तो बेशुद्धच पडला.. त्याच्या नातेवाईकांनी त्याला उचलून देशमुखांकडे नेले.. देशमुखाने पाटलांच्या विरोधात फिर्याद नोंदवली.. आता मात्र पाटील घाबरले.. त्यांना काय करावे काही सुचत नव्हते.. तेव्हा ते श्री महाराजा कडे आले.. महाराजांना सर्व हकीगत सांगितले.. महाराज म्हणाले अरे.. आधी विचार केला नाहीस.. आपण दोघेही समंजस आहात तरी एकमेकांशी भांडता.. लोकांनी आपल्या कडून काय घ्यावे.. महाराजांचे हे बोलणे ऐकून खंडू पाटील यांना आपली चुक समजली.. त्याचा त्यांना पश्चात होत होता.. महाराज म्हणाले काळजी करू नकोस काही होणार नाही.. महाराजांच्या वाणी प्रमाणे खंडू पाटील यांची फिर्यादी तुन सुटका झाली.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !
बोध – अनेकदा आपण रागाच्या भरात चुकीचे काम करतो.. कुणाला काही तरी बोलतो.. आपणस आपली चूक नंतर कळते.. पण नंतर पश्चाताप करून काय उपयोग.. त्या ऐवजी नेहमी कर्म करताना.. कोणतीही प्रतिक्रिया देताना ती एकदम रागात न देता शांतपणे द्यावी..!