यश मिळवणे सोपे आहे

Sep 9, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे… आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण होतो कि ८० टक्के मिळवणे यश नाही का.. आपल्या अपेक्षे प्रमाणे नाही पण याचा अर्थ असा नक्कीच नाही कि अपयश आले आहे..म्हणजेच इथे कुठे तरी अपेक्षे प्रमाणे मार्क्स पडले नाहीत म्हणजेच कुठेतरी आपला अभ्यास कमी पडला असावा .. पण तो विद्यार्थी मिळालेले मार्क्स सोडून जे नाही त्यावर दुःख करतो आणि यश हे अपयश वाटते.. असेच आपल्या जीवनात अनके ठिकाणी घडते.. आपण कुठेतरी नोकरी साठी अर्ज करतो.. जसा आपण अर्ज करतो असेच अनेक जण अर्ज करत असतात.. आपले त्या कंपनीत काम होत नाहीत तेव्हा आपण म्हणतो कि मला यश आले नाह.. खरतर कुठंतरी आपले ज्ञान कमी असेल वा आपल्यासाठी ती नोकरी योग्य नसावी म्हणून मिळाली नसावी पण आपण आलेल अपयश इतके गिरवतो कि आपले मन फक्त अपयश मिळाले एवढेच उत्तर देते.. खरंतर आपणस जेव्हा अपयश मिळते तेव्हा नक्कीच ईश्वर आपणस आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे हा निर्देश देत असतो.. खरंतर आपणस आलेल्या अपयश रुपी पायरीला आपण यशाची पायरी बनवू शकतो.. फक्त गरज असते ती म्हणजे पुन्हा प्रयत्न करण्याची.. आणि अपेक्षित यश मिळण्यासाठी अपयशाला अपयश न म्हणता यशाची एक पायरी पूर्ण झाली असे म्हणू या कारण आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या कार्यावर होतो.. म्हणून अपयश आले तरी नेहमी म्हणूया कि यशाच्या पहिल्या पायरीकडे वाटचाल केली आहे आणखी थोडे कष्ट आवश्यक आहेत कारण यशाच्या जवळच तर मी पोहचलो आहे.. पहा हा एक विचार आपल्या यशाची व्याख्याच बदलून टाकेल.. धन्यवाद समर्था


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...