इच्छा पूर्ती चा मंत्र

Sep 5, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

स्वामीं भक्तहो…इच्छा…आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी… अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन करूया..आपणही करा…पाहूया स्वामीं काय चिंतन मनन करून घेतात..👍

इच्छा.. आपण म्हणतो इच्छा तिथे मार्ग.. आपण हि म्हण लहानपणा पासून ऐकतो आहोत.. पण खरंच आपण यावर विचार केला आहे का … इच्छा आपल्या मनात दिवसभरात किती विचार येतात आणि जातात.. किती इच्छा पूर्ण होतात.. किती इच्छा अपूर्ण राहतात.. म्हणजेच आपल्या अनेकच इच्छा या अतृत्प राहतात.. पण मग आपण असे काही करू शकतो का कि आपल्या इच्छा पूर्ण होतील त्याचा काही राज मार्ग आहे का ? हो आहे.. आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा एका वहीत लिहा.. त्या वहिला आपण इच्छा पूर्ती वही म्हणू या.. या वहीत दिवसभरत आपल्या मनात अश्या कोण कोणत्या इच्छा निर्माण झाल्या त्या लिहा.. इच्छा या वास्तविक अश्या असाव्यात.. जसे मला काही दिवसात इंग्रजी भाषेत बोलण्याची कला अवगत करायची आहे.. प्रत्येक इच्छा जी तुम्हाला पूर्ण करायची आहे ती वहीत लिहीत जा.. ती वही आपल्या इच्छे पूर्तीचे कार्य करणार आहे.. आता आपण इच्छा लिहिली मग ती पूर्ण करण्यासाठी आपणस काय काय करायचे आहे याचे संपूर्ण माहिती लिहून काढा.. त्या नुसार कार्य सुरु करा.. रोज आपण त्या नुसार कार्य करत आहोत कि नाही याचे सुद्धा आपण स्वतः आत्म परीक्षण करा.. करा हळू हळू आपली इच्छा पूर्ण होईल.. काही इच्छा तर अश्या असतील कि ज्या काही दिवसात सुद्धा पूर्ण होतील.. काही साठी कालावधी लागेल.. पहा आपण जाणवेल आपल्यातच इच्छा पूर्तीची जादू आहे पण ती आपण विसरलो होतो.. स्वामी आपणस यश देतातच हा विश्वास आहे.. अनुभव आहे… बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...