स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

Aug 12, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे लागेल..स्वामीं भक्ती सुद्धा अशीच आहे..आपली भक्तीची भुक तेव्हाच वाढेल जेव्हा आपण सेवा करू..सेवा म्हणजे स्वामीं नाम घेणे असेल..स्वामीं च्या लीला वाचून त्यातून स्वामीं काय सांगत आहेत यावर..चिंतन मनन करणे…हे रोज करावे लागेल…यात एक अडचण येते..आपले मन म्हणते..की या लीलेत अमुक व्यक्ती आहेत त्यांनी असे का केले..असे करायला नको होते..खरंतर त्यानी असे या साठी केले की..स्वामीं नी त्यांना बुद्धी दिली की ..पुढच्या पिढीने ही चूक करू नये..म्हणजेच प्रत्येक लीला ही आपली भक्ती वाढण्यासाठी आहे..पण आपण नको ते विचार करून आपले नुकसान करतो..असो आपणस आपली भक्ती वाढवण्यासाठी कार्य करायचे आहे…चला स्वामीं नाम+ चरित्र वाचन+श्रवण+चिंतन मनन करून भक्ती दृढ करूया…! धन्यवाद समर्था..!
आपणही चिंतन मनन करा..ते लिहून काढा..इतरांशी share करा


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...