Share

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून समजून येईल.. पहा मला काहीतरी अडचण आहे जसे मला एखादी वस्तू हवी आहे.. मी स्वामींना म्हणतो.. स्वामी माझे अमुक अमुक काम करा मी तुम्हाला अमुक अमुक देईल.. पहा एकीकडे आपण म्हणतो कि स्वामी तुम्हीं मला द्या.. याचा अर्थ आपले अंतर्मन जाणते कि आपण हे करू शकत नाही या साठी स्वामी कृपा हवी… आता मला सांगा जर मला स्वामीच मला देणार आहेत.. जो देणारा आहे त्याला मी काय देणार..म्हणजेच आपण आपल्यातील भक्ती भाव सोडून व्यवहारिक पणा आणतो..आता आपण अशी प्रार्थना करू शकतो कि स्वामी आपण तर सर्व जाणताच.. तरीही मी प्रार्थना करत आहे.. माझे अमुक अमुक कार्य व्हावे हि प्रार्थना.. पहा इथे प्रार्थना आहे म्हणजे आपल्यातील भक्ती भाव वाढतो.. जर स्वामींना काही द्यायचे असेल तर आपल्यातील अवगुण स्वामी चरणी अर्पण करू.. कारण स्वामी कृपेने ते दूर होतील हा विश्वास आहे..धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद..!! आपणही चिंतन मनन करा.. प्रार्थना करा हि विनंती


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...