आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

Jul 18, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!
श्रावण मासी हर्ष मानसी…आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास…आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग आपल्या भक्ती मुळे तिथे अनेक माश्या होतात..मुंग्या होतात..पहा आपणच मंदिराची स्वच्छता राखली नाही तर ती कोण राखणार..आपणस आपले घर स्वच्छ ठेवतो..तसे मंदिर ही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे…मग आपण म्हणाल आम्ही ईश्वराला काही अर्पण करायचे नाही का? करायचे त्यासाठी मंदिरात..४- ५ डबे ठेवा… त्यात साखर, दूध, जवस, तीळ, दही, तूप,तेल अजून काही असेल ते त्या डब्यात ठेवा.. आपण मंदिरात अर्पण करत आहोत..ते असे अर्पण केले तर मंदिर स्वच्छ राहतील…हार फुले घ्या ती आपल्या घरी घेऊन आपली घरच्या देवाला वाह…श्री फळ ( नारळ) एक तर देवाला अर्पण करा किंवा प्रसाद म्हणून आपल्या घरी घेऊन जा..घरी जाऊन फोडा..आता प्रश्न निर्माण होईल..मंदिरात असे डबे नाहीत..अहो..आपणच आपल्या परीसरातील मंदिरात ही व्यवस्था करावी..पहा खूप छान सेवा होईल..वाहायचे असेल तर श्री महादेवाच्या चरणी फक्त पाणी अर्पण करूया.. मात्र त्याच बरोबर आपल्यातील षड्ररिपू अर्पण करणे अति महत्वाचे आहे..आपण सर्व ज्ञानी आहात.. नक्कीच आपल्या भक्ती मुळे आपले मंदिर आपण स्वच्छ ठेवाल…धन्यवाद स्वामीं..👍
www.chetnakeswar. com


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...