श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७
श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या दर्शनाला जातोस त्यांना प्रार्थना कर आमच्या घरी संतती होऊ दे.. कारण पाटील घराण्यात संतति नव्हती.. कुकाजीच्या म्हणण्याप्रमाणे श्री खंडू पाटील श्री महाराजांना प्रार्थना करतात कि आम्हाला संतती प्राप्ती व्हावी.. यावर श्री महाराज हसतात आणि म्हणतात अरे तुम्ही तर पाटील ना मग हि गोष्ट सुद्धा तुम्हाला सहज प्राप्त करता आली पाहिजे..खंडू पाटील नम्रतेने म्हणतात महाराज जसे पीक हे पाण्याशिवाय येत नाही पण पाऊस पाडणे मनुष्याच्या हाती नाही.. तसेच हीही गोष्ट ईश्वरी इच्छे शिवाय शकय नाही.. महाराज हसतात आणि म्हणतात नक्कीच मी ईश्वराला प्रार्थना करतो कि तुला संतती व्हावी.. फक्त एवढेच कर संतती झाली कि आमरसाचे भोजन सर्वांना दे.. काही दिवसांनी आनंदाची बातमी कानी पडली.. गंगाबाई यांना दिवस गेले.. नवमास पूर्ण झाल्यावर त्यांना संतती झाली.. त्याचे नाव त्यांनी भिकू ठेवले.. पाटील घराणे आनंदी झाले त्यांनी अनेक दानधर्म केले.. तसेच आमरसाचे भोजन हि दिलें.. आजही हि प्रथा सुरु आहे असा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथांत येतो..बोला श्री गजानन महाराज कि जय … !
बोध – आपण सर्व काही प्राप्त करु शकतो परंतु आपण कर्ता नाही तर कर्म करण्यास निमित्त आहोत… कर्म प्रामाणिक करा.. ईश्वराच्या इच्छेने आपणस सर्व काही मिळणारच आहे.. बोला श्री गजानन महाराज कि जय