श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

Jun 25, 2023 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो

हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले ) हे पाहून त्यांचे चारही बंधूना आश्चर्य वाटले.. त्यांनी हरी पाटील ला समजावून सांगितले तू जे करत आहे ते चुकीचे आहे.. आपण पाटील आहोत.. लोक आपले ऐकतात आणि आपण त्या महाराजांची सेवा करता.. हे चारही भाऊ उसाची मुळी घेऊन मंदिरात गेले आणि श्री महाराजांना म्हणतात.. ऊस खाणार का ? जर आपण ऊस खाणार असाल तर आमची एक अट आहे ती जर आपणस मान्य असेल तर आम्ही आपणस ऊस देतो.. आम्ही तुम्हाला उसाने मारणार जर तुमच्या अंगावर एकही वण उठला नाही तरच आम्ही आपणस योगी मानू.. महाराज काहीच बोलले नाही.. त्यातील एक भाऊ म्हणाला महाराज काही बोलत नाही म्हणजेच ते घाबरले आहेत असे मारुती म्हणाल.. तर दुसरा भाऊ गणपती म्हणतो अरे त्यांचे मौन आहे याचा अर्थ त्यांची संमती आहे..ते सर्व जण महाराजांना मारण्यासाठी आले.. हे सर्व पाहून बाकी सर्व सेवेकरी पळून गेली पण भास्कर पाटील मात्र तिथेच थांबले आणि त्या चौघांना सांगत होते.. अरे अशी चूक करू नका.. मात्र ते चौघे मात्र ऐकण्यास तयार नव्हते.. ते मारत होते महाराज मात्र कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते..त्यांनी इतके मारले मात्र महाराजांच्या शरीरावर एक हि वण नव्हता.. हे पाहून ते चौघे घाबरली आणि श्री महाराजांच्या चरणी लीन झाले.. महाराज त्यांना म्हणतात बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो.. श्री महाराजांनी हाताने उसाचा रस काढला न कोणता चरका होता न काही यंत्र.. हे पाहून त्या चारही भावांना महाराजांच्या योग सामर्थ्यचि अनुभूती आली.. अश्या प्रकारे पाटील बंधू श्री महाराजांचे सेवक ( भक्त) झाले .. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !
बोध – श्री महाराज आपली चुकी माफ करतात फक्त आपणस महाराजांना ह्रदयपूर्वक समर्पित व्हायचे आहे.. बोला श्री गजानन महाराज कि जय


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...