श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

Jun 24, 2023 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल )

शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर कुकाजी यांना संतती नव्हती..वडील आणि काका यांच्या मृत्यू नंतर कडताजी यांचा मोठा मुलगा खंडु हा घरातील कारभारी झाला.. पाचही भावंडे त्याच्या आज्ञे नुसार कार्य करत होती.. गणपती, नारायण , मारुती ,हरी आणि कृष्णाजी अशी त्यांचे नावे ,या घराण्याला कुस्ती ची फार आवड होती तसेच आपल्यात असणाऱ्या बळाचा त्यांना फार गर्व होता.. गावातील सर्व लोक त्यांना घाबरत असत..खंडू यांचे भाऊ एकदा मारुतीच्या मंदिरात गेले तिथे श्री महाराज होते.. यांनी महाराजांना त्रास देण्यास सुरवात केली.. महाराजांना अपशब्द बोलत होती.. पण महाराज काहीच बोलले नाही..एके दिवशी हरी पाटील मारुतीच्या मंदिरात आला आणि श्री महाराजांना म्हणाला.. चला आपण माझ्याशी कुस्ती खेळा मी आपणस कुस्तीत चित करतो.. जर तुम्ही मला पाडले तर मी तुम्हाला बक्षीस देईल.. लोकांना हि कळेल कोण आहे सामर्थ्य वान..श्री महाराजांनी हसून होकार दिला आणि दोघे तालमीत गेले.. महाराज तालमीत गेल्यावर मध्यभागी बसून राहिले व हरीला म्हणाले.. जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) .. हरी पाटील ने खूप प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.. हरी ने मनातल्या मनात विचार केला नक्कीच हे कुणीतरी सामर्थ्यवान आहेत.. त्यामुळेच त्यांनी आज पर्यंत आपण इतका त्रास दिला तरी तो त्यांनी सहन केला.. हरी पाटील महाराजांच्या चरणी लीन झाला.. महाराज त्याला म्हणाले अरे शरीर , घरदार आणि संपत्ती याचा मान करावा गर्व नाही.. आता आम्हाला आमचे बक्षीस दे.. तुझ्याकडे जे काही त्याने सर्व गावाचे कल्याण कर.. हरी पाटलाला महाराजांचे म्हणणे पटले.. तो महाराजांचा शिष्य झाला.. बोला श्री गजानन महाराज कि जय… !

बोध – वरील लीलेतून बोध होतो कि आपल्या कडे जे काही आहे त्याचा गर्व करू नका तर त्याचा सदुपयोग करा.. कारण गर्वाचे घर नेहमी खाली असते.. बोला श्री गजानन महाराज कि जय


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...