श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

Jun 18, 2023 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस!

शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो सूर्य उपासक होता.. तो रोज न चुकता सूर्याला अर्घ्य देत असे.. एके दिवशी वज्रभूषण अर्घ्य देत असताना त्याला सूर्याच्या जागी श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले.. तेव्हा श्री महाराज तिथेच बसलेले होते..वज्रभूषण तात्काळ महाराजच्या चरणी लीन होतो.. महाराजांच्या चरणी अर्घ्य समर्पित करतो.. आरती करतो.. महाराजांची स्तुति करतो.. मला आज माझ्या सेवेचे फळ मिळाले.. आपल्या दर्शनाने माझ्या सर्व चिंतेचे हरण झाले आहे.. महाराज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि उपदेश करतात कि कर्म मार्ग सोडू नकोस.. मात्र फळाच्या अपेक्षेत न अडकता अखंड कर्म करत रहा.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – वरील लीलेतून श्री महाराज आपणस कर्म करण्याचा उपदेश करत आहेत.. कर्म करा पण विना फळाची अपेक्षा म्हणजेच कर्म तो पर्यंत करत रहा जो पर्यंत यश मिळत नाही.. !


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...