स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण एक प्रकारे नकारात्मक वातावरण तयार करतो.. पहा आपण म्हणतो वास्तू नेहमी काय म्हणते तथास्तु.. मग जेव्हा आपण म्हणतो आमच्या किंवा इतर कुणाच्या हि वास्तूत दोष आहे तेव्हा वास्तू काय म्हणेल.. म्हणजेच आपले विचार बदला..आपल्या बोलण्याची पद्धती बदला नक्कीच आपणस प्रत्येक वास्तू हि चांगलीच दिसेल कारण जशी दृष्टी वा विचार तशी सृष्टी आपण आपल्या जीवनात निर्माण करतो.. आता आपल्या विचारातील दोष घालवायचा आहे.. चला तर मग त्यासाठी रोज आपल्या घरात रोज हि प्रार्थना करूया.. पहा कसे बदल घडतात.. ..!
प्रार्थना – हे वास्तू देवता आज पर्यंत तू आम्हाला.. ऊन वारा , पाऊस , थंडी या पासून आमचे रक्षण केले त्याबद्दल धन्यवाद.. आम्हाला निवारा दिलास त्याबद्दल धन्यवाद.. आज पर्यंत माझ्यातील अज्ञान मुळे मी काही नकारात्मक तुझ्याविषयी बोललो असेल तर त्याबद्दल आम्हाला माफ कर.. तू तर पवित्रच आहेस पण आमचे मन नको नको त्या शंका घेते त्याबद्दल आम्हाला माफ कर.. आज पर्यंत जसे आमचे रक्षण केलेस.. अशीच तुझी साथ आम्हाला लाभू दे..आजपर्यंत जशी तू अनेक पिढ्याना साथ दिलीस अशीच साथ इथून पुढे देत रहा.. धन्यवाद वास्तू देवता.. कोटी कोटी धन्यवाद..बोला शी स्वामी समर्थ महाराज कि जय