मंथन करा..आपल्यातील विचारांचे

Mar 1, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

!!श्री स्वामी समर्थ!!
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ
पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..!

स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके वाचतो..त्याचे मंथन करा..ते मंथन कुठे करा आपल्या अंतर्मनात करा…आपण म्हणाल मंथन करून काय होईल..पहा..दूध आहे. ते तापवले की साय येते…मंथन झाले..दुधाचे.. दही केले की आंबटपणा येतो..मंथन झाले..दह्याचे.. ताक केले.. लोणी निघते…मंथन झाले..लोणी तापवले…की तूप निघते..दुधाचे तूप होण्याची प्रक्रिया…असेच जेव्हा आपल्या विचारांचे मंथन होईल..कधी जेव्हा आपण वाचन करू..श्रवण करू..तेव्हा..त्यात माऊली सांगत आहेत..हे मंथन करताना नको असणारा भाग सोडून द्या.. त्याचा मूळ गाभा धरा.. त्यावर कार्य करा..जसे दुधात तूप आहे..तसेच आपल्यातच सर्वकाही आहे..बाकी गोष्टीत अडकू नका.. पहा कसे जीवन होते..या सोबत महत्वाचे..नाम घ्या..कोणतंही घ्या..पण सातत्याने घ्या..पहा स्वामींना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती होईल..धन्यवाद स्वामीं… कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...