देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

Feb 22, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

श्री स्वामी समर्थ
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥

हरिपाठ ओवी चिंतन मनन

स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची अनुभूती येते..खरंतर देवाचं द्वार म्हणजे काय हे आधी समजून घेणे आवश्यक आहे.. देवाचे द्वार म्हणजे इथे माऊली आपणस कोणत्या मंदिरता जाण्यास सांगत आहेत का ? हो आपणस माऊली मंदिरात जाण्यास सांगत आहेत.. पण मग प्रश्न निर्माण होतो..कोणत्या मंदिरात ? माऊली सांगत आहेत ते मंदिर म्हणजे जे आपल्या सर्वांना मिळाले आहे..हे मंदिर नसेल तर आपले आस्तित्व संपते..हे मंदिर म्हणजे आपले शरीर..आपले शरीर मंदिरच आहे..पहा आपण थोडा वेळ श्वास रोखला तर काय होते..या मंदिरातून नाद होतो..श्वास घे ..नाहीतर माझे आस्तित्व संपेल..म्हणजेच आपणस प्राप्त शरीर हेच मंदिर आहे..आता हे मंदिर कसे आहे? आपण कधी आत डोकावतो का? आपण म्हणाला सिटी स्कॅन केले की संपूर्ण शरीर दिसते.. अहो पण आपल्यातील..चांगलेपणा किंवा वाईटपणा त्यात दिसतो का ? नाही..आपण स्वतःच आपले अंतर्मुख दर्शन घेऊ शकतो का उघड्या डोळ्यांनी? नाही..मग या मंदिरातील स्व चे दर्शन होणार कसे.. माऊली सांगतात क्षणभर जरी आपण आपल्या आत डोकावण्याचा प्रयत्न केला तरी आपणस मुक्ती चा अनुभव येईल..आता आपण म्हणाला हे लगेचच झाले पाहिजे..ते शक्य नाही.. त्या साठी आपणस स्वामीं नाम घ्यावे लागेल..श्री स्वामी समर्थ म्हणा , राम कृष्ण हरी म्हणा, किंवा आणखी कोणतेही नाम घ्या..यात सातत्य ठेवा.. नाम घेता घेता..नामात दंग व्हा..पहा.. हळुहळु आपले मन नामावर स्थिर होईत..अनेक स्व अनुभव येतील, व्यक्तिमत्व विकास होईल..अजूनही बरेच काही होईल..फक्त गरज आहे..आपल्याला जे शरीर रुपी मंदिर मिळाले आहे..त्याचा खरा अर्थ समजून उपयोग करण्याचा.. बाकी सर्व होईल..फक्त सेवेत सातत्य ठेवा.. धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...