प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस.

Feb 19, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५९३(पर्व ४ थे भाग ९७)

प्रेरणादायी बोल

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस..अरे विश्वास ठेवा !! प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात.. स्वामींची सम्पूर्ण शक्ती असते..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. स्वामी महाराज आजच्या स्वामी वाणी तुन आपणस.. प्रामाणिक कष्ट करण्यास सांगत आहेत.. प्रामाणिकपणा हा असा गुण आहे ज्या साठी साधनेची आवश्यकता आहे.. पहा आपल्या मनात येईल कि आजच्या काळात प्रामाणिक पणे काम करणे शक्यच नाही.. पहा आपण इतरांकडून प्रामाणिक पणाची अपेक्षा करतो मग सर्वप्रथम आपणस हा गुण आपल्यात धारण करणे आवश्यक नाही का? आपण जसे पेरतो तसेच उगवते.. प्राणिकपणाने चालताना आपणस अडचणी येतील.. पण त्या अडचणींवर मात करून जर आपण आपल्यातील प्रामाणिकपणा हा गुण सोडला नाही तर आपण याचा अर्थ प्रामाणिक कष्ट करत आहोत.. खरंतर यास कष्ट न म्हणतात आपण स्वामींची प्रामाणीक सेवा म्हणू शकतो कारण आपण प्रत्येक कर्म स्वामी सेवा समजून करतो ना.. कधी कधी आपणस अमुक एखादे काम करताना लाज वाटते आपले मन म्हणते कि मी हे काम कसे करू.. खरंतर कोणतेच काम छोटे नसते वा मोठे नसते जेव्हा आपण ते करत असताना हा भाव ठेवू कि हि स्वामी सेवा आहे.. जेव्हा अशा भावनेने आपण प्रामाणिक कष्ट करतो तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात.. आपणस कार्य करण्यास बळ देत असतात.. म्हणून आज पासून आपणस आपल्यातील प्रामाणिक कष्ट करण्याचा गुण अवगत करायचा आहे.. धन्यवाद समर्था.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...