आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

Feb 18, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६)

प्रेरणादायी बोल
आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!!
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया…अक्कलकोट गावात स्वामी प्रथम गावा बाहेरील खंडोबाच्या मंदिरात आले. तीन दिवस हे परब्रम्ह उपाशी होते. अहमद अलीखान ह्या रिसालदार ने स्वामींना एक वेडा व्यक्ती समजून मजाक मध्ये रिकामी चिलीम देऊन ” हुक्का पीता का?” असे विचारले…तेव्हा स्वामीनी ‘ हो मी हुक्का पितो !!’ असे म्हणून रिकामी चिलीम हातात घेतली आणि ओढण्यास सुरुवात केली तर चमत्कार असा घडला कि त्या चिलीम मधून धूर यायला लागला… हा चमत्कार बघून रिसालदार आश्चर्य चकित झाला आणि महाराज कोणीतरी अवलिया असावेत ह्याची त्याला खात्री झाली ..ह्या नंतर स्वामी तीन दिवस उपाशीच आहे हे समजल्या नंतर चोळप्पाच्या घरी स्वामींना जेवणासाठी नेले …
चोळप्पाच्या घरी जेवणास गेल्या नंतर स्वामीनी सर्वप्रथम रीसालदारास ताटाला हात लावण्यास सांगितले ..पण मी मुसलमान ताटाला हात कसा लावू म्हणून त्याचे धाडस झाले नाही ..पुन्हा स्वामीनी पुन्हा आज्ञा केली अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल !! मग मात्र रिसालदाराने ताटाला हात लावला.. आणि त्या नंतर स्वामींनी जेवण केले .


बोध

स्वामी तर परब्रम्ह आहे..खोल महासागराच्या तळाशी असलेल्या छोट्याश्या मासोळीच्या अन्नाची सोय स्वामीनी केली आहे मग त्यांना तीन दिवस उपाशी राहण्याची गरज काय ? हा प्रश्न सहाजिकच आहे .. खरे तर..स्वामीच्या मनातील आपण काय ओळखणार? पण भक्तीयुक्त अंत:करणाने स्वामिनीच जे मनन करवून घेतले त्यातून असे समजते कि , ह्या आगळ्या वेगळ्या अवतारात स्वामीनी अक्कलकोट हे स्थान पुढील कार्या साठी निश्चित केले होते.. ह्यातूनच अहमद अलीखान च्या हाताने एका हिंदू घरात स्वामीनी जेवण करून “ईश्वरा समोर कुणी हिंदू नाही अथवा कुणी मुसलमान नाही तो फक्त भक्ती भावनेचा भुकेला आहे ” हा स्पष्ट संकेत दिला आणि विशेष म्हणजे अशा काळात कि ज्या काळात हे स्पृश्य अस्पृश्य असे कर्मकांड स्तोम जास्त माजलेले होते..


Share
और पढिये !!

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...