लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

Feb 15, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)*

*प्रेरणादायी बोल*

एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ कर्म कर..उगाचच हा विचार करू नकोस की लोक काय म्हणतील..आपल्या सर्वांच्या मनात हा विचार घर करून बसलेला असतो की..मी हे कर्म केले तर लोक काय म्हणतील..अहो लोक काय म्हणतील या पेक्षा तुला काय वाटते..आपल्या स्वामीं ना काय वाटते हे महत्वाचे… अनेकदा एखादा कार्यक्रम असतो..लोक नाचत असतात..आपल्या मनात असते मी ही नाचावे..पण मनात विचार येतो..मी नाचलो तर लोक काय म्हणतील…अरे तुला आनंद मिळत आहे ना..तुझ्या आनंदाने कुणाचे नुकसान तर होणार नाही..स्वामीं ना तर कर्म आवडणारे असेल तर मग का विचार करतोस लोक काय म्हणतील.. लोक काय विचार करतील या विचाराने अनेक लोक आपले मन सुद्धा मोकळे करत नाहीत.. त्याचा परिणाम नको तिथे राग निघणे, कामात चुकी होणे असा होतो…अनेकदा आपण आपल्या मुलांनाही सांगतो.. अरे असे करू नकोस लोक काय म्हणतील? अहो या पेक्षा मुलांना सांगा तुला काय करावे वाटते हे मनसोक्तपणे बोल..त्याला बोलू द्या…त्यावर आधी चिंतन मनंन करा..जर अयोग्य असेल तर का अयोग्य आहे ते सांगा..पण कारण वास्तविक असावे..जर आपल्या मुलांचे म्हणणे बरोबर असेल.. तर लोक काय म्हणतील या पेक्षा ..ही गोष्ट याला करू न दिल्यामुळे त्याचे किती नुकसान होईल हा विचार करा..फक्त एकच गोष्ट करा..स्वामीं ना भूषणावह कर्म करा..पहा कसे आनंदी जीवन होतें..धन्यवाद स्वामीं… कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...