Share

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७)

अमृत वचन

हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो… आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत…आपणस अनेक प्रश्न असतात..अडचणी असतात त्याची उत्तरे आपणस मिळत नाहीत..मग आपण ते प्रश्न इतरांना विचारतो.. उदाहरणार्थ मला आर्थिक समस्या आहे..मग मी काय करतो..अनेक लोकांना विचारतो की माझी समस्या कशी सुटेल..मग समोरची व्यक्ती काही तरी सांगते ते आपण करतो..कधी यश येते.. कधी अपयश येते..पुन्हा आपण आपला प्रश्न घेऊन अजून कुणाकडे जातो…तो आणखी काहीतरी सांगतो..परत आपला प्रवास सुरु होतो..पण आपण कधीच स्वतः ला त्या प्रश्नांची उत्तरे विचारत नाही..कारण आपणस स्वतःला प्रश्न विचार असे कधी कुणी सांगत नाही..आज स्वामीं आपणास सांगत आहेत..हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! ह्रदयाचा आवाज म्हणजे काय? हे आपण आधी समजून घेऊ…विचार हा एक असतो पण.. जे सतत येत जात असतात ते विचार..दुसरे विचार असतात जे आपण शांत असताना येतात त्याला आपण हृदयाचा आवाज म्हणतो.. ..जेव्हा आपण आपल्या आता डोकावतो..कोणताही निर्णय घेताना शांत होतो..सर्व विचार सोडून आपले मन आपल्या ह्रदयावर केंद्रित करतो..मन भटकंती करते..पुन्हा आपण त्याला ह्रदयावर आणतो..याला म्हणतात ह्रदयावर जाणे..हा एक अभ्यास आहे..जो प्रत्येकाने केला पाहीजे…या साठी रोज थोडा वेळ बसा.. सुरवातीला कंटाळा येईल..नंतर आवड निर्माण होईल..आपल्या मनात प्रश्न आहे..तो प्रश्न स्वामीं ना सांगा..स्वामीं आपण तर सर्व जाणताच कृपा करा मला ह्रदयातून मार्गदर्शन करा..प्रार्थना झाली की..डोळे झाका..स्वामीं समोर बसा..मनात विचार येतील..येऊ द्या..विचार आले तसे जातील..आपणस मनाला आपल्या ह्रदय स्थानावर आणायचं आहे..सुरवातीला ५ मिनिट प्रयत्न करा..नंतर ही वेळ १० , २० मिनिट करा..पहा काय काय उत्तरे आपणस मिळतात..आता यात महत्वाचे..आपणस मिळालेले उत्तर आहे की आपले नेहमीचे विचार आहेत हे तपासून पहा..जसे आर्थिक समस्या आहे..आणि आपल्याला उत्तर मिळत आहे..व्यवसाय कर ..पण हा विचार खरंच आपल्या हृदयातून येत आहे कि इतर करतात म्हणून मला सुद्धा व्यवसाय करायचा आहे हे तपासून पहा.. जे काही विचार येत आहेत ते लिहून काढा.. त्यावर चिंतन मनन करा.. अश्या विचारांवर काम करायचे नाही..ज्या वर आपण अभ्यास केलेला नसेल.. आपणस सकारात्मक उत्तर मिळाले पाहिजे..कारण ह्रदयातून मिळणारे मार्गदर्शन हे..आपणस तर सुख..आनंद देतेच पण त्याच बरोबर ते समाज हितकारी असते.. रोज थोडा वेळ तरी आपल्या हृदय स्थानावर जा.. पहा नक्कीच स्वामीना अपेक्षित असणारी अभिव्यक्ती होईल.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...