Share

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन ‘होकार’ देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे “नाही” बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !!

www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता गुण वाढवण्यास सांगत आहेत.. पहा विश्वसनीयता हा शब्द आपण अनेकदा ऐकतो बोलतो.. पण हा गुण आपण इतरांकडून अपेक्षा करतो पण हा गुण आधी आपण विकसित करणे आवश्यक आहे. तो कसा विकसित करायचा हे स्वामींनी आपणस सांगितले आले.. पहिल्याच ओवीत स्वामी सांगत आहेत अरे एखादे कार्य आहे जे करणे आपणस शक्य नसेल तर स्प्ष्ट पणे नकार दे.. उगाचच भावनिक होऊन होकार देऊ नकोस.. म्हणजे नेमकं काय तर आपण एका उदाहरणातून पाहू.. समजा आपणस कुणीतरी उसने पैसे मागत आहे.. आता ती व्यक्ती म्हणते मला १०० रुपये उसने देतोस का ? दोन तीन दिवसांत दिले तरी चालतील.. आपण त्या व्यक्तीला पैसे देत असू तर काहीच हरकत नाही.. पण कधी कधी आपण काय करतो आपणस देण्याची इच्छा नसते..पण त्याला वाईट वाटू नये यासाठी आपण देतो म्हणतो किंवा खोटं खोटं प्रयत्न करतो म्हणतो.. ती व्यक्ती आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवते.. आपण मात्र तिला पैसे देत नाही..जेव्हा दोन दिवसांनी आपण त्या व्यक्तीला सांगतो अरे शक्य नाही.. हेच आपण जर त्या व्यक्तीला पहिल्यांदाच सांगितले असते कि मला पैसे देणे शक्य नाही.. जेव्हा आपण नाही म्हंटलो तेव्हा कदाचित तिला वाईट वाटले असते पण त्या व्यक्तीला आपल्या बाबत भविष्यात विश्वास निर्माण होईल कि व्यक्ती जे म्हणते तेच करते.. इथे आपण अनेक उदाहरणा द्वारे हि स्वामी वाणी समजून घेऊ शकतो.. थोडक्यात आपल्या बोलण्यात मृदु भाषेत स्पष्टपणा असावा.. हा सप्ष्टपणा आपल्यात आत्मविश्वास निर्माण करेल..आपले संपूर्ण व्यक्तिमत्व हे विश्वसनीय असे बनेल.. धन्यवाद स्वामी .. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय .. !


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...